अमळनेर तालुक्यासह शहरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार केली बेटिंग.
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात गारपीट सह .वादळी वाऱ्याचा जोर एवढा होता की शहरातील अर्धा ते पाऊण तासातच अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले यात डॉ. हिम्मत सुर्यवंशी यांच्या शेतातील पळासदळे शिवारात सारबेटा रस्त्यावर सुंदरगढी येथे लिंबू च्या बागेत साधारणपणे ७० ते ८० लिंबूची झाडें पूर्णपणे उलमडून पडली. गेल्या सात वर्षाची या शेतकऱ्याची संपूर्ण मेहनत वाया गेली. लिंबूचा पूर्ण उन्हाळी बहार वादळी वारा आणि पावसामुळे खराब झाला असून नुकसान झाले आहे तर शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा ही वादळी वाऱ्यामुळे विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अमळनेर तालुक्यातील बऱ्याच भागात जोरदार गारपीटीसह अवकाळी वादळी पाऊस झाला. यामुळे गहू,हरभरा, मका व फळबागांचे आणी शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
अमळनेर शहरात देखील अनेक ठिकाणी झाडे पडली.
न्यू प्लॉट, ढेकू रोड, पिंपळे रोड,प्रताप मिल कंपाउंड, ख्वाजा नगर,तांबेपुरा माळीवाडा, रुबजी नगर, आर के नगर, पैलाड, शिरूर नाका, राजाराम नगर, या भागात झाडे पडली आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स देखील वाऱ्यामुळे उडून गेले. सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले.