एसटी मध्ये महिला आरक्षणातून चेंगराचेंगरी! महाराष्ट्राचं होतोय यूपी- बिहार..महिला 50 टक्के आरक्षण एक चिंतन…
नागपूर /मुंबई :- महाराष्ट्र सरकारने महिलांना बस मध्ये अर्धी तिकीट आरक्षण दिल्यापासून महाराष्ट्राचे युपी- बिहार प्रमाणे ट्रान्सपोर्ट होणार की काय? असे भांकीत वर्तविले जात आहे. एसटी मध्ये 52 सीट आरक्षित असताना, क्षमतेच्या वर दुप्पट प्रवासी वाहण्याची वेळ एसटी महामंडळावर आलेली आहे. सवलतीच्या लाभासापोटी महिलांची प्रचंड गर्दी बस मध्ये होताना पाहायला मिळतो. सरकारने आरक्षण दिले पण एसटी महामंडळाकडे आरक्षित बस फेऱ्यांची परिपुर्तता न केल्याने; क्षमते अभावी आरक्षित व गैर आरक्षित प्रवाशांना एकाच बसमध्ये प्रवास करावे लागतों. एकीकडे यूपी- बिहार मध्ये असलेली रोडवेज ट्रान्सपोर्ट परिस्थिती प्रमाणे त्रासलेली महाराष्ट्रीयन जनता बसच्या छतावर बसेल की, काय? वा,जागे अभावी एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सभोवती लटकवून नेणार की काय? अशी परिस्थिती महाराष्ट्रात एसटीची निर्माण झालेली आहें. सरकारने महिलांना बस फेरीमध्ये आरक्षण दिल्याने भविष्यात पुरुष मतदार सुद्धा आरक्षणाचे मागणीवर मतदान करणार की काय? असे बरेच प्रश्न महाराष्ट्रीयन जनतेमध्ये निर्माण होत आहेत. आरक्षणावरच सरकारला हेरण्याची तयारी विविध पक्षांमधून पुढे येणाऱ्या चुनावात होणार की काय? असे विविध प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे बस मध्ये संधी साधून कडून महिला संदर्भात अनैतिक प्रकार घडताना पाहायला मिळत असतात ;परंतु अर्धे तिकिटाचे प्रलोभनापोटी महिला मात्र वाटेल तसा प्रवास करायला हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. एसटीचे बस फेरी वेळापत्रक बिघडलेले असूनही सवलत देण्याआधी एसटी संख्या परिपूर्णता करायला पाहिजे होती मात्र तसे न केल्याने एसटी संख्या आवश्यकतेपेक्षा कमी व सवलत मिळविणाऱ्या महिलांची संख्या मात्र दुप्पट भरत आहे त्यामुळे एसटी प्रवाशांची तारांबळ उडालेली आहे.