चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात मागण्या मान्य करा, आता माघार नाही….
प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपूर – 30 टक्के वेतनवाढ, समान काम, समान वेतन NMR पद्धत च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा,तसेच अनेक अश्या प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनि 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे दंड प्रशासनाविरोधात थोपटले आहे.
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे, कामगारांनी मागील विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे 28 कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ची स्थापना केली.
समितीतर्फे सर्व वीज कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी 9 फेब्रुवारीपासून 6 टप्प्यात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
5 मार्च ला मध्यरात्री पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला होता, त्यानुसार आज सकाळी 10 वाजतापासून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रासमोर राष्ट्रवादी नगर येथे वीज कामगारांनी बेमुदत कामबंद धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.
यावेळी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संयुक्त कृती समिती तर्फे कामगार संघटना प्रतिनिधी महाराष्ट्र नवनर्माण कामगार संघटना अध्यक्ष गजानन जवादे, यांनी कामगाराच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या अशी मागणी शासन दरबारी केली…
यावेळी महाराष्ट्र विज मंडळ कृती समिती चंद्रपूर चे पदाधिकारी आणि सर्व कामगार प्रामुख्याने उपस्थित होते.