वृक्ष प्रेमीकडून आंदोलनाचा इशारा
चाळीसगाव तालुक्यात दरवर्षी शेकडो ट्रक वृक्षतोड अवैध्यरितीने होत आहे.डेरेदार झाडांची कत्तल आधूनिक कटरच्या सहाय्याने केली जाते.पर्यावरण प्रेमी वारंवार याबाबत वनविभागातील कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही लाकडांच्या व्यापाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याने वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन संपुर्ण तालुक्यात डेरेदार झाडांची कत्तल राजरोसपणे सुरू आहे.पावसाळ्यात शेतात पिके असल्याने अवैध्य वृक्षतोडीचे प्रमाण कमी असते.परतू सध्या पावसाळी पिके काढली गेल्यामुळे लाकूड व्यापाऱ्यांची काही ग्रामीण भागातील दलाल टोळकी सक्रीय झाली असून ते वनविभागातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध प्रस्तापित करुन दररोज शेकडो झाडांची कत्तल करत आहेत.अवैध्य वृक्षतोड होत आहे.याबाबत आवाज उठवणाऱ्या पर्यावरण प्रेमींना धमकावणे, त्यांना अडचणीत आणण्यासाठी हे भ्रष्ट कर्मचारी प्रयत्न करतात.त्यामुळे डोळ्यासमोर वृक्षतोड होत असतांनाही कोन्ही पुढे येत नाही.अशी परिस्थीती तालुक्यात आहे.एक प्रकारे “कुंपणच शेत खात आहे.”एकीकडे शासन पर्यावरण रक्षणासाठी व वृक्षसंवर्धनासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करत आहे.आणि दुसरीकडे विस विस, तिस तिस वर्षाची मोठंमोठी जुनी डेरेदार झाडे अवैध्यरित्या तोडली, कत्तल केली जात आहेत.हा प्रकार थांबवावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.या षडयंत्रातील सहभागी दोषी वनकर्मचारऱ्यांची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई न झाल्यास व अवैध्य वृक्षतोड त्वरित न थांबल्यास पर्यावरण प्रेमीं व्यापक आंदोलन करतील.असा ईशारा पर्यावरण प्रेमी,लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी यांनी दिला आहे.
वृक्षतोडीवर आळा बसावा म्हणून काही सामाजिक संघटना व पत्रकार यांच्या मदतीने नेहमी प्रयत्न केले जातात. नुकतेच अवैध वृक्षतोड संदर्भात लाकडाच्या भरलेल्या वाहनांची विचारपूस केल्याचा राग येऊन नुकतीच पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना संबंधित व्यापाऱ्याकडून धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात संबंधितांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.