संगणक परिचारक संस्थेचा विधानभवनावर मोर्चा.
रजत डेकाटे // प्रतिनिधी नागपूर
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान संगणक परिचारक संस्थेचा टेकडी रोड येथे मोर्चा सुरू आहे.
गेल्या ११ वर्षांपासून संगणक परिचारक हे ग्रामपंचायत येथे काम करीत आहे.
शासनाचा व जनतेचा दुवा म्हणून संगणक परिचारक यांच्या पाहिले जाते. प्रत्येक अधिवेशनाला संगणक परिचारक संस्था मोर्चे व आंदोलने करीत असतात. परंतु संगणक परिचारक संस्थेचा मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे.
कोरोणाकाळामध्ये जीवाचे रान करून ग्रामपंचायत मधील संगणक परिचारक हे अत्यावश्यक सेवा पुरवित होते.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संगणक परिचारक ऑनलाईन व ऑफलाईन कामे करीत असतात.
शासनाच्या १५० वरील सेवा ह्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम संगणक परिचारक करीत आहे.
संगणक परिचारक संस्थेचा माध्यमातून महाराष्ट्र शासनाला ३ वेळा ग्रामविकास विभागाकडून पारितोषिक मिळविले.
मात्र सरकारने त्यांच्या मागण्यावर पाणी फिरवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आली ती पण कागदापुरतीच व आश्वासन देण्यात आले ते पण नावापुरतेच.
संगणक परिचारक संघटनेवर न्याय सोडून अन्याय करीत आहे.
असे संगणक परिचारक संस्थेच्या माध्यमातून सांगितले आहे.