इंदापूर तालुक्याच्या आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज असलेल्या बापूसाहेब देहूकर यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन हरिनाम सप्ताहाची सांगता.
निरा नरसिंहपूर: दिनांक-६, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झालेल्या हरिनाम सप्ताहांपैकी अतिशय अलौकिक व भव्य- दिव्य सप्ताहाचे आयोजन हे निरा नरसिंहपुर येथे करण्यात आले होते. कर्नाटक व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून भजन आणि कीर्तन ऐकण्यासाठी लोक येत होते. पुण्यातील देहू, आळंदी तसेच पंढरपूर मधून भरपूर वारकरी मंडळी या सप्ताहासाठी उपस्थित होते. रोज एक हजाराच्या पटीमध्ये टाळकरी असत तर या कार्यक्रमासाठी 5000 पेक्षा जास्त भाविक असत.
काल्याचे किर्तन हे बापूसाहेब देहूकर यांचे चिरंजीव ह. भ. प. सोहम महाराज देहूकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचे माजी आमदार तथा माजी संसदीय मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील साहेब, इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार तथा राज्यमंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे , पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय आप्पासाहेब जगदाळे, कल्याणराव काळे , निरा नरसिंहपुर गावचे विद्यमान सरपंच सौ.अर्चना नितीन सरवदे , सरपंच प्रतिनिधी सिनेअभिनेते, दिग्दर्शक नितीन सरवदे, इंदापूर तालुका भाजपचे सचिव विलासजी ताटे देशमुख, तुळजाभवानी दूध संकलन केंद्राचे संचालक तानाजी काजळे, ह. भ. प . अंकुश रणखांबे महाराजांच्या, ह. भ. प आनंद काकडे महाराज , ह.भ. प. सचिन बुवा मोहिते महाराज, ह. भ .प.राम अभंग महाराज , ह. भ. प. महेश सुतार महाराज, ह. भ .प .प्रभाकर जगताप महाराज , विजय सरवदे, चंद्रकांत सरवदे,गौतम सरवदे, मेननाथ सरवदे, मनोज मासुळे, सुरेश धोत्रे ,पप्पू गोसावी, किशोर मोहिते, नाथाजी मोहिते, शहाजी पावसे ,अतुल घोगरे, बळीराम गलांडे, राजू बळवंतराव , डॉक्टर अरुण वैद्य,सुभाष जपे, अण्णासाहेब काळे, नरहरी काळे, अक्षय गोडसे, अमोल गोडसे, प्रमोद दंडवते, कमलेश डिंगरे, दिगांबर डिंगरे, उमाकांत केसकर , ग्रामसेवक महेश कुमार म्हेत्रे , संतोष मोरे, अरुण क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, आबा ताटे, आबा घाडगे, जगदीश सुतार, बापू जगदाळे, ऋषी सरवदे, राजेंद्र निंबाळकर ,पांडुरंग मोरे, गिरवी गावचे सरपंच पांडुरंग डिसले तसेच गिरवी गावचे उपसरपंच दादासाहेब क्षीरसागर, टणु गावचे सरपंच मोहिते-पाटील साहेब व ताईसाहेब, राजेंद्र देशमुख, विठ्ठल देशमुख , उमेश कोळी आणि सर्व आदरणीय भजनी मंडळी ,वारकरी मंडळी तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक यांनी नरसिंह नगरी दुमदुमून गेली होती.
बऱ्याचशा वक्त्यांनी बापूसाहेब महाराज यांच्या विषयी आपापले अनुभव सांगितले व त्यांच्या सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली व आशीर्वाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी बापूसाहेब यांनी कार्यक्रमासाठी जर कोणाला त्रास झाला असेल तर दिलगिरी व्यक्त केली आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी , वारकरी मंडळी, कीर्तनकार यांना फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले .बाहेरून आलेल्या नेतेमंडळींचे सत्कार केले. आजी माजी आमदार यांनी बापूसाहेब यांचा तुकाराम महाराज यांची पगडी, तुळशीचा हार तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. महाप्रसादाच्या पंगती नंतर कार्यक्रमाची सांगता ही अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडली.