माहूरगडावरून ज्योत भिलाली गावात दाखल
४१० किमी चे अंतर पायी चालत आणली ज्योत
भिलालीत लोकवर्गणीतून साकारले आई रेणुका मातेचे भव्य मंदिर
दि.१४ ऑक्टोबर पासून विविध धार्मिक कार्यक्रमे
दि.१५ ऑक्टोबर रोजी आई रेणुका माता प्राणप्रतिष्ठा सोहळा
रत्नापिंप्री ता.पारोळा-प्रतिनिधी मयुर पाटील:- चार शे दहा कि.मी. अंतर पायी चालत महाहूर गडावरून ज्योत भिलाली गावात दाखल झाली आहे भिलाली गावातील रेणुका मातेचे मंदिर प्रांत प्रतिष्ठा सोडण्यासाठी माहुर गडावर मातेच्या भक्तांनी पायी चालत चक्क चार शे दहा किलोमीटर वरून मातेच्या मूळ स्थानातून माहूरगड येथून ज्योत घेऊन भाविक भिलाली गावात दाखल झाले आहेत या ज्योत चे गेल्या चार-पाच दिवसापासून पायी प्रवास करीत भाविकांनी ही ज्योत आज गावात पोहोचले आहेत या ज्योत चे दररोज ठीक ठिकाणी स्वागतही करण्यात आले. ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या तसेच मातेच्या जयघोषात ही ज्योत मोठ्या परिश्रमातून भिलाली गावात दाखल झाल्यानंतर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे दि. १४ ऑक्टोबर पासून रेणुका मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भव्य मंदिराची लोकवर्गणीतून उभारणी करण्यात आली आहे आणि या ठिकाणी रेणुका मातेची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडत आहे या कार्यक्रमासाठी चक्क चार शे कि.मी.असलेल्या मातेच्या मूळ स्थानात पासून ही ज्योत वाजत गाजत गावात दाखल झाली ज्योत गावात दाखल होताच गावातील भाविकांनी महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली होती आणि या ज्योत चे स्वागत या गावातील भाविकांनी केले प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने भव्य मंदिराचे उभारणी तर करण्यात आली आली असली तरी या ठिकाणी मोठ्या यात्रेचे स्वरूप निर्माण यात्रेसाठी मोठी व्यवस्था ही करण्यात आली आहे गावातील स्व परिश्रमातून आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून भव्य मंदिराच्या आवारातच नव्हे तर गावात साफसफाई करून विविध उपक्रम राबविले जात आहेत या निमित्ताने गावात धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे या कार्यक्रमाप्रसंगी मोठे मोठे दुकाने तसेच यात्रेसाठी उपलब्ध होणाऱ्या दुकानांची उपलब्धता झाली आहे यासाठी पाळणा ,पालखी देखील मोठे आकर्षण ठरत आहेत मंदिराच्या आवारात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे भिलाली गावातच नव्हे तर परिसरात तील पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
भिलाली येथे लोकवर्गणीतून आई रेणुका मातेच्या भव्य मंदीराची उभारणी करण्यात आली असून मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यासाठी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होत आहे आणि या निमित्ताने माहूरगडाहून ज्योत आणून या मंदिरात माहूर गडाच्या रेणुका मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दि.१४ ऑक्टोबर व दि.१५ ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे भिलाली येथे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ रेणूका माता माहूरगड वासिनी भिलाली गावाने रेणुका मातेचे भव्य मंदिर मंदिराची उभारणी केली आहे दिनांक १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने दिनांक १४ ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते रात्री उशिरापर्यंत रेणुका मातेच्या भव्य दिव्य मूर्तीचे गावातून भव्य मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीत जलप्रवेश धारी महिला तसेच विविध धार्मिक कार्यक्रम साजरी केली जाणार आहेत याबरोबरच महिला पुरुष यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले तर दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मातेच्या मूर्तीचे विशीवर पुजा प्रतिष्ठा सकाळी सात वाजता करण्यात येणार आहे मूर्तीच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन करताना भव्य महाप्रसादाचे आयोजन दुपारपासून करण्यात आले आहे रात्री आठ वाजता ह.भ.प.प्रकाश महाराज शिंदखेडा यांचे जाहीर किर्तनाचा कार्यक्रम होईल यासाठी भिलाली, हिवरखेडा ,रत्नापिंप्री, कंकराज, बहादरपूर ,शिरसोदे,महाळपूर, कन्हेरे,शेवगे, फापोरे,कोळपिंप्री,अंबापिंप्री आदी पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
ज्योत मशालीच्या स्वागतासाठी भिलाली येथून आज पहाटे अनेक महिला व पुरुषांनी वाटेतच २० किमी अंतरावर जंगी स्वागत केले. स्वागतासाठी पहाटे चार वाजेपासूनच भिलाली गावातून शेकडो महिला पुरुष या मशाल घेऊन येणाऱ्या भाविकांचे तसेच मशालीचे स्वागत पुष्प वर्षावाने केले यावेळी पायी मशाल ज्योत हाती घेत महिलांनीही आपला सहभाग नोंदवला तर रत्नापिंप्री येथील हर हर महादेव बहुउद्देशीय संस्था भिलाली या संस्थेचे वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज आय.टी.आय. काँलेजवर जंगी मनोभावे स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी आई रेणुका मातीचे ज्योती स्वागत पुजन करण्यात आले
माहूरगड ते भिलाली गाव चारशे दहा किमतीचे अंतर पायी चालत दि.९ ऑक्टोबर पासून चार ते पाच दिवसांत हि ज्योत भिलाली गावात आणणाऱ्या भाविकांन मध्ये मशाल हाती घेवून राजेंद्र पाटील , शिवाजी पाटील , प्रकाश साळुंखे , श्रीराम विसपुते , हेमंत पाटील , निंबाजी पाटील , दिपक पाटील , भगवान पाटील , सतीष पाटील , प्रविण पाटील , सतीष पाटील , सुधाम पाटील , राहुल , कोळी , आशूतोश पाटील , रावसाहेब पाटील , नवनीत पाटील , कैलास पाटील , राहुल पाटील , भावेश पाटील , विकास कोळी , सुभाष कोळी , मनोज पाटील , दिनानाथ पाटील , चंद्रशेखर पाटील ,अरुण पाटील , भूषण कोळी , पंकज पाटील , दिनेश पाटील , सुनिल पवार , प्रमोद पाटील , गणेश पाटीलराजेंद्र पाटील , शिवाजी पाटील , प्रकाश साळुंखे , श्रीराम विसपुते , हेमंत पाटील , निंबाजी पाटील , दिपक पाटील , बाळू पाटील , भाऊसाहेब भगवान पाटील , सतीष पाटील , प्रविण पाटील , सतीष पाटील , सुधाम पाटील , राहुल , कोळी , आशूतोश पाटील , रावसाहेब पाटील , नवनीत पाटील , कैलास पाटील , राहुल पाटील , भावेश पाटील , विकास कोळी , सुभाष कोळी , मनोज पाटील , दिनानाथ पाटील , चंद्रशेखर पाटील ,_अरुण पाटील , भूषण कोळी , पंकज पाटील , दिनेश पाटील , सुनिल पवार , प्रमोद पाटील , गणेश पाटील भिलाली गावकरी भक्तांनी आपला प्रवास केला आणि पाचव्या दिवशी भिलाली गावात त्यांचे स्वागत करण्यात आले.