आपली शाखा आपली शान असते.ती मिंधे गटालाही वापरायला मान्यता देणे हा चक्क षंढपणा आहे !
हे कृत्य आपले शयनगृह परक्याला वापरण्यास मान्यता देण्यासारखे आहे.
आम्हाला खंबीर नेतृत्व हवे ! असे डरपोक व शरणागती पत्करणारे नेतृत्व असेल तर निष्ठावंत शिवसैनिक ताठ मानेने जगू शकणार नाहीत. केवळ मिंद्यांचे सरकार आहे म्हणून त्यांच्या दादागिरीपुढे नतमस्तक होऊन बाहेर विजयी वीरांप्रमाणे वावरणारे नेतृत्व काय कामाचे. वरतोंड करून सांगायतचे- *शाखा तर आमच्याच ताब्यात आहे* *पोलीसांच्या सांण्यावरून त्यांनापण शाखेत बसायला मान्यता दिली असे म्हणणारे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनुयायी असू शकत नाही.
काल परवा जे आमचे आदेश मानत होते त्यांनी शाखेची टाळी तोडून बळजबरीने शाखेत घुसखोरी करायची आणि आम्ही जश्यास तसे उत्तर देऊन त्यांची हकालपट्टी करण्या ऐवजी रडतराऊत प्रमाणे पोलीसांची मदत घ्यायची व पोलीसांचा “दोघांनी वापरा” हा अजब सल्ला गपगुमान मान्य करायचा ! का तर पोलीस केस नको म्हणून ? आणि यांना आम्ही नेते म्हणायचे ! हे नेते फक्त बॅनर होर्डींगवर व वाढ दिवसापुरतेच आहेत. *आपल्या शाखांचे या मिंद्यांपासून रक्षण करू न शकणारे व त्यांना ती शेअर करायला देणारे द्रोपदीचे पती आहेत. आम्हाला द्रोपदीचे रक्षण करणारे नेतृत्व, सारथी हवे आहेत.*
याच षंढपणामुळे मिंधे गटाच्या माजलेल्या गद्दारांनी आजवर ४ शाखा काबिज केल्या आहेत. आमच्या नेत्यांनी मिंधे गटाच्या एकातरी शाखेबाबत जश्यास तसे या न्यायाने तसे धोरण अवलंबले आहे का ? नसेल तर अशा लाचार हतबल नेत्यांना आम्ही नेते का मानावे ? ते हतबल आहेत, पद सांभाळू शकत नाहीत असे वरिष्ठांना सांगून रडत रडत आम्हाला पदमुक्त करा ! अशी विनवणी करूनही आमचे नेते त्यांनाच का गोंजारत आहेत ? पर्याय नाही हे म्हणणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा घोर अपमान आहे.
याच न्यायाने जर उद्या मिंधे गटाने सेना भवनमध्ये शिरकाव केला तर आपण असेच दोघांनी वापरा ! असे म्हणून तडजोड करणार आहोत का ? मग आमच्या शाखाही सेना भवनचीच शाखा आहे. आम्ही तडजोड करून पोलीसांची शिफारस (दोघांनी वापरा)
ही जर मर्दुमकी व विजय वाटत असेल तर या नेत्यांना आम्ही नेते मानणे व त्यांना वरिष्ठांनी मुकसंमती देणे हे क्लेषदायक आहे.
*मिंधेच्या दडपशाहीला बळी पडून तिथे गेलेले रमेश चव्हाण व राजेंद्र चौधरी या पळपुट्यांना जर आमचे नेते शह देऊ शकत नसतील तर माझा सारखा अतिसर्वसामान्य शिवसैनिक त्यांना नडण्याचा मुर्खपणा करतो, असेच म्हणावे लागेल. सुरेश पाटील आज ८ महिने तडिपार आहे, त्याची तडिपारी आम्ही रद्द करू शकत नाही, मग असे नेतृत्व हवेच कशाला ?*
पांढरे शुभ्र कडक इस्त्रीचे कपडे घालून महागड्या गाडीचा धुरळा उडवत नेत्यांच्या आसपास घुटमळणारे नेते काय कामाचे ? यामुळे काही दिवसांत उल्हासनगरच्या सर्व शाखा मिंधे गटाच्या घश्यात गेल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. *मला एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे “या ज्या शाखा बळकावल्या जात आहेत त्या डॉ.बालाजी किणीकर यांच्या अंबरनाथ विधानसभेच्या क्षेत्रात येतात.” उद्या विधानसभा निवडणुकीत या शाखांतून मिंधे गट निवडणुक प्रचार कार्यालय थाटणार नाही कशावरून ? तसे झाले तर आम्ही काय करायचे ?
नेत्यांनी कितीही षंढपणा करू दे पण मी एक आव्हान देत आहे ते मिंधे गटाने स्विकारण्याची हिंमत दाखवावी. माझी लालचक्की विभाग शाखा ५० वर्ंषापासून कार्यरत आहे.ती अंबरनाथ मतदार संघात येते. या शाखेकडे वाकड्या नजरेने पाहून बघा ! आहे का हिंमत ? मला कोणत्याही जिल्हा प्रमुख, समन्वयक अथवा शहर प्रमुखाची गरज नाही फक्त मला कळवून शाखा ताब्यात घ्यायला या ! रक्तपात झाला, मी धारातीर्थी पडलो तरी ही शाखा कोणाच्याही बापाला ताब्यात घेऊ देणार नाही. ३० वर्षापुर्वी दिघे विरोधकांनी ही शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मी एकटाच दारासमोर आडवा बाकडा टाकून बसलो होतो व ती शाखा ताब्यात घेऊ दिली नव्हती. त्यावेळचा एक दिघे विरोधक आज मोठा पदाधिकारी आहे. त्यावेळीही उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या दोन पदाधिका-यांना पदमुक्त केले होते त्यातलाच एक आज आमचा नेता म्हणवतो !
तितरांची टोळी जमवून वाघाची शिकार करता येत नाही ! हे मिंधे गटाच्या रणझोडदास गद्दारांनी लक्षात ठेवावे.
हे जर पटत नसेल तर माझ्यावर कारवाई करू शकता !
दिलीप मालवणकर
अतिसर्वसामान्य शिवसैनिक