> इस्रायल कधी स्वतंत्र झाला ? मुळात..इस्रायल स्वतंत्र झाला नाही ! स्वतंत्र झाला तो पॅलेस्टाईन..! आणि इस्रायल तयार केला गेला..! जसा भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान तयार केला गेला.
सूत्र तेच होतं..सोपं.. अरब लोक जास्त असलेला भाग Palestineकडे आणि ज्यू जास्त असलेला भाग इस्रायलकडे..! फक्त हा सगळा वाळवंटी भाग(लाल )असल्याने..असाही खूप मोठा भाग होता जिथे १९४७-४८ ला कोणीही राहत नव्हतं..म्हणून.. हा भाग साहजिकच नव्या लाडक्या इस्रायलला दिला गेला.. साहजिकच..
पॅलेस्टाईन लोकांत.. असंतोष पसरला ! त्यांच्या देशाचा खूप मोठा भाग नव्या देशाला दिला म्हणूनच नाही तर त्यांचा अरब बहुल भाग २ जागी विभागला गेला म्हणूनही.. पश्चिमेकडे असणारा West Bank(लाल) आणि पूर्वेकडील समुद्रालगतची चिंचोळी पट्टी म्हणजे गाझा strip(पट्टी) (पिवळी
>> हमास म्हणजे काय ? आता..अशी असमान फाळणी झाली.. त्यात ह्या नव्या गैर इस्लाम ज्यू इस्रायलने १४ मे १९४८ ला स्वातंत्र्य जाहीर केले..त्याला लगेच अमेरिकेने मान्यताही दिली..! पण हे आजूबाजूच्या इस्लाम देशांना मान्य नव्हते..आणि म्हणून त्यांनी युद्ध सुरू केले..!
त्या युद्धाचा अंत म्हणून.. १९४९ ला इस्रायलने शेजारी खालचा हिरवा इजिप्त , उजवीकडे खाली लाल जॉर्डन , उजवीकडे वर हिरवा सीरिया , थेट वर छोटा पिवळा लेबनॉन ह्या देशांशी करार करून देशाच्या सीमा निश्चित केल्या. पण..असा कुठलाही करार पॅलेस्टाईन सोबत केला नाही..!!
कारण कदाचित ह्या १९४९ च्या युद्धात त्यांना कळून चुकले असेल की.. देशाच्या सीमेअंतर्गत असा त्यांचा दुस्वास करणारा इस्लामिक देश असणे नेहमीसाठी धोक्याचे असेल..! भारतात हैद्राबाद,मुरुड जंजिरा,जुनागढ असे पाकिस्तानचे भाग (?!) तयार झाले असते तर आपल्याला काय वाटले असते तेच..! असो.. तर..
हा असा करार न झाल्याने.. पॅलेस्टाईनमध्ये दोन मतप्रवाह / दोन राजकीय पक्ष तयार झाले.. एक मवाळ.. Fatah.. (सेक्युलर,West Bank मध्ये, लाल) जे म्हणतात..झालं ते झालं..पुढे प्रगती करू..आमच्यासोबत करार करा..सीमा निश्चित करा..आम्ही नंतर कधीही तुमच्यावर जमिनीवर हक्क सांगणार नाही..!
दुसरा जहाल.. हमास.. (कट्टर इस्लामिक, गाझा पट्टी मध्ये, पिवळी पट्टी ) जे म्हणतात..आधी आमच्या सीमा निश्चित करार करा..म्हणजे..तुम्ही आमच्या भागात येऊ नका..मग..आम्ही तुमच्या भागात..जो मूळचा आमचाच आहे..त्या भागात यायचं का नाही ते ठरवू.. आणि इस्रायलचं म्हणाल तर..
त्यांना हे दोघेही नकोय..! हैदराबाद संस्थानचा निजाम जरी मवाळ (फतह Fatah सारखा) असता तरी देशाच्या आत असा पाकिस्तानचा भाग भारताला मान्य झाला नसता..आणि जहाल (हमास Hamas सारखा) असताना तर ते मान्य होणं शक्यच नव्हतं..! म्हणून आता..इस्रायलने ह्या दोघांसोबतची व्यूहरचना ठरवून टाकलीय..
गेल्या काही वर्षापासून इस्रायल जगातील कोणत्याही देशाचा ज्यू असेल तर त्यांना नागरिकत्व देतेय..! आणि अशा आलेल्या लोकांना राहायला जागा Fatah नियंत्रित west bank मध्ये मोठ्ठे उंच कंपाऊंड असलेल्या ज्यू वसाहतीत (निळे ठिपके) मिळते..! थोडक्यात.. Purification by Dilution..! म्हणून..
आज पाहिले तर.. उजवीकडच्या West Bank ची बरीच मोठी जमीन इस्रायलची झालीय..आणि त्या भागात राहणाऱ्या ~ २५ लाख लोकांपैकी ~७ लाख लोक ज्यू आहेत..! असे होत गेल्याने.. त्या भागातले अनेक अरब पण इस्रायलचे नागरिक झालेत..आज इस्रायलचे ~ २०+% नागरिक मुस्लिम अरब आहेत..! याउलट..
गाझा पट्टीचे कट्टर लोक..त्यांचा राजकीय दृष्टीकोन..हमास..अगदीच जहाल व जिहादी असल्याने.. इस्त्रायल.. त्यांनी आक्रमण किंवा आतंकवादी हल्ले केल्यावर ” बहुत करारा जवाब ” द्यायला बघते..! त्यांनी आधीच गाझा पट्टीत..सीमेपासून ३ किमी पर्यंत कोणीही राहू नये असे सांगून टाकले आहे..! (लाल)
एकूणच काय तर.. काल झालेले आक्रमण.. इस्रायलच्या long term strategy च्या पथ्यावर पडल्यासारखे आहे..! म्हणून इस्त्रायल ह्या चालू युद्धाचे कारण दाखवून गाझाला कायमचे कोंडून..आणि जहाल हमासला पुरते संपवूनच थांबल्यास नवल वाटायला नको..! आणि ह्या युद्धाने इस्रायलचा..मिटला तर फक्त –
देश सीमा अंतर्गत दहशतवाद किंवा सुरक्षेचा प्रश्न मिटेल..पण.. त्यानंतर..किंवा त्यासोबतच इराण व इतर इस्लामिक देशांचे() मोठे प्रबळ आव्हान उभेच असेल.. आता बोला..तुम्हाला काय वाटतं..कोण बरोबर आहे ?! इस्त्रायल का पॅलेस्टाईन..?! टीप – वरील सर्व माहिती अभ्यासाच्या वेळेस वाचलेली-लेखक अजय