कर्मयोगीने आईवडिलांचे छत्र हरवलेल्या गौरी गणेशांना सायकली देऊन साजरा केला गणेशोत्सव…
★ कर्मयोगी ही संस्कार देणारी संस्था.. दीनानाथ पडोळे
★ गणेशोत्सव २५ सायकलचे वाटप करून कृतीतून साजरा…
कर्मयोगी फाऊंडेशनने आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी व त्यांनाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी २०२३ मध्ये १०१ सायकल वाटपाचा संकल्प केला आहे. या संकल्पाचे चार टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी या संकल्पाचा दुसरा टप्पा
गणेशोत्सवाचे औचित्य साधत
दि.२४ सप्टेंबर २०२३ ला आई सभागृह बुटीबोरी येथे आई वडिलांचे छत्र हरवलेल्या गौरी गणेशांना २५ सायकली देवून कृतीतून गणेशोत्सव साजरा करत २५ सायकल।वाटपाचा दुसरा टप्पा संपन्न झाला. विशेष म्हणजे आतापर्यंत २०१ सायकलचे वाटप कर्मयोगी कडून करण्यात आले आहे.
.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रचना हॉस्पिटल बुटीबोरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विठ्ठलराव दांडगे, उदघाटक माजी नगरसेविका नागपूरच्या परिणिती फुके प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नागपूरचे दिनानाथ पडोळे, युवा नेता राष्ट्रवादी काँग्रेस सलील देशमुख,
सामाजिक कार्यकर्ते संजय धोटे, गायत्री शक्तीपीठ नागपूरचे विश्वस्त संजय काळे, महिला व बालकल्याण सभापती नगरपरिषद बुटीबोरीच्या संध्या आंबटकर, शिक्षण व सांस्कृतिक सभापती नगरपरिषद बुटीबोरीचे विनोद लोहकरे ही प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. विट्ठल दांडगे म्हणाले की मी कर्मयोगीचे कार्य मला कोरोना काळापासून अवगत आहेत, त्यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले व तेच सेवेचे कार्य त्यांचे अविरत सुरू आहे. यावेळी मार्गदर्शन करताना दिनानाथ पडोळे म्हणाले की पादत्राणे काढण्यापासून ते प्रत्येकाचे औक्षण करून त्याला सन्मानाने बसविणे हे बघून माझ्या लक्षात आले की कर्मयोगी ही खऱ्या अर्थाने संस्कार देणारी संस्था आहे. यांना मार्गदर्शनाची गरजच नाही, यांना गरज आहे ती सहकार्याची कारण प्रत्येक घटकांवर त्यांनी कार्य केले आहे, या चांगल्या कार्याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, एक मोठं कार्य उभारण्याची क्षमता कर्मयोगी फाऊंडेशन मध्ये आहे, असे ते यावेळी आवर्जुन म्हणाले.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी सांगितले की, आमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होता या जगात इतकं, प्रेम, मानसन्मान देणारं कोणी आहे याची परिचिती आज आम्हाला पहिल्यांदा आली. आमच्या मुलांच्या कोवळ्या मनावर आज जी त्यांनी प्रेमाची व मदतीची फुंकर घातली ती आम्ही आयुष्यभर विसरणार नाही…
तसेच हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी अनेक लोक दूरदूरच्या गावावरून आले होते. त्यात प्रामुख्याने अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सोबतच प्रा.डॉ. प्रशांत कडू , ज्ञानेश्वरदादा रक्षक, देवीदास लाखे, राजू गावंडे, संकेतसिंग दीक्षित वसंतराव जेऊरकर, मंगेश सवाने, अमजद शेख, विनोद तितरे, विजय पाटील, पत्रकार संदीप बलविर, नासिर हुसेन ही प्रतिष्ठित मंडळी व मोठ्या प्रमाणात महिला व बालक मंडळी उपस्थित होती..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली…