अमळनेरकरांनो सावधान… बातमी पाण्याची, पाणी पुरवठा दोन दिवस उशिराने..!
अमळनेर: विक्की जाधव..
जीवास धोका निर्माण होईल अश्या पाण्याच्या टाकीची केव्हाच.. करायची होती दुरुस्ती.
पण पालिकेच्या हलगर्जीपणामुळे जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचे अक्षरशः सिमेंटचा स्लॅब चे पोपडे एक – एक करून पडत आहेत.
राहदारी आणि गर्दी चे ठिकाण असेलेल्या झामी चौक परिसरात रस्त्याला लागून नगर परिषदे ची भली मोठी उंच पाण्याची टाकी आहे.
या परिसरात खूप डाटादाटीच्यां वस्त्या असुन नाहक कोणाच्या निषपाप बळी ह्या पाण्याच्या टाकी खाली जातो कीं काय हीच वाट नगर परिषद आणि प्रशासन बघत होते, आहे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
एव्हड्या दिवसांनी आताच आली जाग..??
शहरातील झामी चौक भागातील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने ती पाडण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षा पासून डेंजर झोन म्हध्ये ह्या टाकी ची नोंद झाली नाही, झाली तर अजून काम का झाले नाही. शहरात असे प्रश्नांचा सामान्यांना चर्चेचा विषय होत आहे.
त्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईप लाईन बायपास जोडण्याचे काम मोठ्या कसरतीने करण्याची नगरपालिकेने हाती घेतले असल्याने अमळनेर शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार आहे असे कळते.
तर यां भागात होणार पाणीपुरवठा दोन दिवस उशिरा..
झामी चौक , पानखिडकी ,साळी वाडा ,माळी वाडा ,पाठक गल्ली,शिरूडनाका ,बालाजीपुरा , पटवारी कॉलनी , दत्त हाऊसिंग सोसायटी. पैलाड, भोई वाडा, तांबेपुरा , सानेनगर , न्यू प्लॉट ,मुंबई गल्ली ,मेहतर कॉलनी ,गांधलीपुरा , ढेकू रोड ,पिंपळे रोड (कोर्ट टाकीवरील भाग)आदी भागातील पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.