चिमनपुरी पिंपळे परिसात पावसा अभावी शेतकरी संकटात..
प्रतिनिधी : चिमनपुरी पिंपळे
परिसरात पावसा अभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीपासूनच अजून पर्यंत दमदार पाऊस झालेलाच नाही..नुसता रोज शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पाहत असतो 25 दिवसा पासून पाऊसाने दडी मारली आहे पण शेतकऱ्यांच्या हाकेला पाऊस हा धावलाच नाही पाऊस अभावी शेतातील पीके मका, ज्वारी, बाजरी,मुग, उडीद,सोयाबीन, कापुस ही पिके सुकू लागली व त्यांची वाढ खुंटली आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी परिसरातील
शेतकऱ्यांची मागणी होत आहे.