खाकीच्या दारात गरजूंना न्यायरूपी उजेड देणारे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे
(मयुर पाटील)
पारोळा – 114 खेडी असलेला व जिल्ह्यात राजकारणाची परिपक्व पाठशाळा म्हणून ओळखला जाणारा पारोळा तालुका यात अवघ्या 16 महिन्यात सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांच्या नायनाट करण्यास कटीबद्ध असलेले,
अंमलबजावणीसाठी नियमितगस्त, हायटेक तंत्रज्ञानाचा वापर आणि गुन्हेगारांवर करडीनजर या गोष्टींवर सातत्याने लक्ष ठेवून गुन्हेगारांचे कर्दनकाळ तर गरजूंना न्यायरूपी उजेड देणारे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस सहकारी यांच्या मदतीने सुमारे 800 गुन्हे दाखल करत त्यातील तब्बल सुमारे 500 च्या वर गुन्हे उघडीस आणून
खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था यांची सांगड घालत पारोळा तालुका तंटामुक्त केला.
पोलीस निरीक्षक श्री वाकोडे यांनी यापूर्वी नागपूर, पाच पावली, इमाम वाडा, भिवंडी, वसई ,नालासोपारा जेजुरी, सासवड, शिरूर, रावेर वडनेरा, धरणगाव जिल्हा पेठ व पारोळा अशा आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत सत्तेच्या बाजूने न्याय देत
नागरिकांत पोलिसांविषयीची भावना समाज मनात बदलविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून शेतकरी, व्यापारी, कामगार, व्यावसायिक, मजूर वर्ग यांच्यासह सामाजिक, सहकार आदी क्षेत्रातील
गरजूंना कायदा व सुव्यवस्थेचा माध्यमातून चोरीस गेलेल्या वस्तू मुद्देमाला सह परत करत व ती वस्तू चोरी करणाऱ्या गुन्हेगारास खाकीचा बडगा उगारून तो हे कृत्य पुन्हा करणार नाही. अशा स्वरूपात श्री वाकोडे यांनी पारोळा पोलीस स्टेशन चा कारभार सांभाळ जनतेच्या अपेक्षा व त्यांना न्याय देण्याची भूमिका वेळोवेळी घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रक अडवून लागोपाठ दोन दरोडे ची घटना घडली.
आपल्या कार्य कुशल नियोजन व जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे, तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव व पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या बारा तासात दोन्ही दरोडे उघडीस आणून आरोपींना जेरबंद करण्यात आले.
तसेच ट्रक चालकांना लुटणारे अट्टल गुन्हेगारांना जळगाव तांबापुरा येथे अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.
दरवर्षी पारोळा तालुक्यात प्रति तिरुपती बालाजी महाराजांचा यात्रा उत्सव, चोरवड येथील श्री दत्त मंदिर
यात्रा उत्सव, बहादरपूर येथील श्री बद्रीनाथ मंदिर येथील यात्रा उत्सव व पिंपळकोठे येथील यात्रा उत्सव अशा उत्सवात कोणतीही जबरी चोरी न होता भाविकांनी सामाजिक सलोखाराखत यात्रा उत्सवाचा आनंद घेतला. हे सर्व यात्रा उत्सव
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या कार्यकाळात शांततामय वातावरणात पार पडल्या. ही विशेष
बाब अधोरेखित करता येईल.
रात्रीच्या गस्तचे आॅन दी स्पॉट व्हेरिफिकेशन
शहरासह तालुक्यात रात्रीची गस्त शहरासह ग्रामीण भागात वाढण्यासाठी पुन्हा एक पोलीस व्हॅन
ची मागणी करत दोन पोलीस व्हॅन मदतीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप तयार करून ऑन द स्पॉट व्हेरिफिकेशन करत पोलीस निरीक्षक श्री वाकोडे यांनी वेळोवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
रेकॉर्ड गुन्ह्यावरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हे दाखल केले. तर अक्षरशा त्यांची धिंड काढत हे गुन्हेगारांचे राज नसून हे कायद्याचे राज आहे. अशी बतावणी करत कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल या भावनेतून त्यांनी आपल्या 35 वर्षाच्या पोलीस कारकीर्द नेहमी कामाचा ठसा उमटविला.
पोलिसांचे खात्रीशीर बातमीदार संकल्पना यशस्वी
ग्रामीण भागात रस्ता, बांध, पाणी फेकणे, शेतातील रस्ते, विहिरीचे पाणी, गाव चावडीवरील गप्पा टप्पा या माध्यमातून किरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून पोलीस निरीक्षक श्री रामदास वाकोडे यांनी ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करत पोलीस पाटील यांच्या माध्यमातून गावात नेहमी संपर्क राहण्यासाठी व चोऱ्या संदर्भात माहिती मिळावी यासाठी पोलिसांचे खात्रीशीर बातमीदार या संकल्पनेच्या माध्यमातून अनेक युवक युवतींना पोलीस मित्र तयार करत गाव पातळीवर शांतता राहण्यासाठी विविध उपक्रम तसेच लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली. गावोगावी ग्राम बैठका घेत ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेतले.
जेजुरी भूषण व शांतिदूत पुरस्कार
श्री वाकोडे यांनी प्रामाणिकपणे आपल्या कार्यकाळात पोलीस निरीक्षक ही पदाची जबाबदारी सांभाळून सामाजिक बांधिलकीतुन
त्यांनी अपघातग्रस्त किंवा गरजूंना तब्बल बारा वेळा रक्तदान करून खाकीतील दर्दी समाजसेवक याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांसमोर ठेवला. जेजुरी येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश मिळाल्यामुळे तेथील जनतेने जेजुरी भूषण पुरस्कार देत श्री वाकोडे यांचा सन्मान केला.
तर रावेर येथे राष्ट्रीय एकात्मता म्हणून हिंदू मुस्लिम बांधवांनी त्यांना शांतीदूत पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला.
महिला दक्षता ,पोलीस पाटील यांचा नियमित आढावा
ग्रामीण भागात पोलीस पाटील हा जनता व पोलीस यांच्यातील दुवा तर शहरी भागात महिलांच्या सुरक्षेसाठी
दामिनी व निर्भया पथक महत्त्वपूर्ण भूमिका निभवतात. यासाठी या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांची महिन्याच्या दहा तारखेला विविध विषयांवर बैठक घेत त्यांचा आढावा घेऊन तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत अनेकांचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवले तर अनेकांची दिलजमाई व मनोमिलन करत अनेक कुटुंब सुखी केले.
त्यामुळे तालुक्यातील जनता त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत असून त्यांच्या 16 महिन्याची कारकीर्द ही पोलीस स्टेशनच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून अधोरेखित केली जाईल एवढे मात्र निश्चित. तसेच
फिर्यादी व आरोपी या दोघांचे म्हणणे समजून त्यातील बारकावे लक्षात घेत सत्याच्या बाजूने नेहमी न्याय देण्याची भूमिका पोलीस निरीक्षक श्री वाकोडे यांची असल्यामुळे तालुक्यातील जनता ही त्यांच्या कार्याची दखल नक्कीच घेतील.
व येणाऱ्या काळात त्यांच्या कारकिर्दीचा वारसा पुढे असाच चालू रहावा अशी अपेक्षा करीत आहे.
दरम्यान अनेक वेळा पोलीस निरीक्षक श्री वाकोडे यांना आपले कार्य बजावताना हस्तक्षेपाला सामोरे जावे लागले. मात्र सत्याच्या बाजूने कुणाचीही तमा न बाळगता सत्याला न्याय देत माफीला क्षमा न बाळगता प्रसंगी कठोर भूमिका घेऊन अनेकांवर मोक्का कायदा अंतर्गत तर काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत खाकीचा खरा हिसका दाखवण्यात कसू भरही फरक ठेवण्यात श्री वाकोडे कमी पडले नाहीत.
तालुक्यातील जनता व विविध क्षेत्रातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्यांचा कार्याचा गौरव तारीख 31 जुलै रोजी करीत असून
ते सेवा कार्यातूननिवृत्त होत असले तरी समाजसेवा तसेच वर्दीतील दर्दी समाजसेवक ही त्यांची व्यक्तिमत्व नेहमी समाजासाठी उपयोगी राहील.
एवढे मात्र निश्चित !