अमळनेर :विक्की उत्तम जाधव..
वाढत्या तापमानामुळे निसर्गाचे चक्र बदलले असून, प्रत्येक
ऋतू २२ दिवसांनी पुढे सरकला असल्याने शेतकऱ्यांनी ७ जूनऐवजी २७
ते २८ जूनला पेरणी करावी. म्हणजे पिकांच्या
आणि निसर्गाच्या अनियमितपणाच्या संकटाला सामोरे
जावे लागणार नाही, असा दावा यांनी केले.
अंबिका मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले. फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपतर्फे मोफत
शेतकरी मेळावा अंबिका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
दरवर्षी महाराष्ट्रात १० जुलै ते १५ जुलै, १८ जुलै पाऊस पडतोच, १६
सप्टेंबरपासून पाच दिवस पाऊस पडतोच; तसेच २ डिसेंबरपासून पाच
दिवस अवकाळी पाऊस पडतोच, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक अॅड. ललिता पाटील यांनीही मनोगत
व्यक्त केले. या मेळाव्यास माजी कुलगुरू एस. ए. पाटील, प्रा. श्याम
पाटील, संचालक पराग पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,
माजी सभापती श्याम अहिरे, ॲड. व्ही. आर. पाटील,
जयवंतराव पाटील, प्रेमराज चव्हाण, धनगर पाटील, पोलिस
निरीक्षक विजय शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी, तर आभार भारती पाटील
यांनी मानले.