June 30, 2025 5:02 pm

शिक्षक भरती संदर्भात मगितलेले कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने प्रताप महाविद्यालयात धरणे आंदोलन सुरू

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिक्षण उपसंचालक
नाशिक यांच्या पत्रानुसार शिक्षक भरती संदर्भात मगितलेले कागदपत्रे न दिल्याने प्रताप महाविद्यालयात लोटन चौधरी व दिलीप जैन
यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

70 वर्षाचा म्हतारा गेली सहा वर्षा पासून मारतोय चक्कर, तरी यांना लाज कशी नाही वाटत??

विक्की उत्तम जाधव.. 9175050300

लोटन महारु चौधरी व दिलीप जैन यांनी १७ जुलै रोजी आपणास शिक्षण उपसंचालक  दि १७ जुलै चे पत्र देऊन पोच घेतली. त्यानंतर सोमवारी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत अशा तोंडी सूचना प्राचार्यांनी दिल्या. सोमवारी कागदपत्रे घेण्यासाठी आले असतांना संस्थेने कागदपत्रे देण्यास नाकारले व शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडून कागदपत्रे  प्राप्त झाले नसल्याने आपणास कागदपत्रे देऊ शकत नाही पत्र प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. असे प्राचार्यांनी पत्राला पोच देतांना लिहिल्याने म्हणून सोमवारी धरणे आंदोलन सुरू केले आहे. लोटन चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे प्रताप महाविद्यालयातील जानेवारी २०१७ मधील १८ कनिष्ट शिक्षकांच्या संगनमताने केलेल्या बोगस भरती व आर्थिक व्यवहार करुन बोगस कागदपत्रे तयार करून आपल्या कार्याध्यक्षाकडून मान्यता दिल्याबद्दल कार्यवाही करणेबाबतच्या विषयांकित पत्रात माहिती व कागदपत्रांची मागणी केलेली होती.  मात्र अद्याप सदरची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्राप्त झालेली नाही.
त्यामुळे अपिलकर्ता यांना सदरची माहिती देता आलेली नाही. सदरची माहिती लोटन महारु चौधरी यांना पत्र मिळाल्यानंतर १० दिवसाच्या आत माहिती देणेबाबत
कार्यवाही करण्यात यावी. असे पत्र नाशिक उपसंचालक यांनी दिले होते. मात्र त्याबाबत माहिती न दिल्याने लोटन चौधरी यांनी हे आंदोलन सुरू  केले आहे.

आरक्षण दिव्यांग रोष्टर कायदा 2016 नुसार बिंदुनामवली डावलली असण्याची चर्चाही जाणकरांकडून वर्तवली जात आहे.
अर्थात या भरतीत दिव्यांग बिंदुनामवली आवश्यकच होती .

 

यां पूर्वी ही शिक्षण उपसंचालकांनी कनिष्ठ महाविद्यालयातील भरतीचे प्रकरण नस्तिबद्ध केल्यानंतरही १८
कर्मचाऱ्यांचे पगार कसे काढण्यात आले? 

याची माहिती मागितल्यावरही मिळाली नाही, २०१७ मध्ये खान्देश शिक्षण मंडळात बेकायदेशीररीत्या पदभार घेतलेल्या कार्याध्यक्षांनी बेकायदेशीररीत्या १८ कर्मचारी भरती केली. ही भरती स्थानिक वृत्तपत्रात
गुपचूप जाहिरात देऊन करण्यात आली. याबाबत लोटन महारू चौधरी यांनी शासन व शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्यानंतर शासनाने पदभरतीस बंदी असल्याने परवानगीचे प्रस्ताव नाकारून सर्व प्रकरणे नस्तिबद्ध केली होती. तरीदेखील कार्यकारी मंडळाने सुमारे दीड वर्षांपासून या बेकायदेशीर भरती केलेल्या शिक्षकांचा पगार नियमित काढणे सुरू केले ला होता. कोणत्या आधारावर पगार काढला ?? 

भरतीचा, कर्मचारी सूची प्रस्ताव मंजुरी, याबाबत लोटन चौधरी यांनी खा. शि. मंडळाचे प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती अधिकारअंतर्गत
माहिती मागितली होती. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केल्याने लोटन चौधरी यांनी दुपारी प्रताप महाविद्यालयाच्या कार्यालया बाहेर ठिय्या मांडला होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!