व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या वाढदिवसा निमित्त परिवर्तनवादी कविसंमेलन संपन्न.
लोकशाही ही दिवसेंदिवस ठोकशाही होत चालली आहे.- मराठी पत्रकार संघाचे मंत्रालयीन संपर्क प्रमुख नितीन जाधव.
प्रतिनिधी- विकी ओहोळ
8446119158
दौंड – जगदीशब्द फाऊंडेशनचे संस्थापक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक जगदीश ओहोळ यांच्या वाढदिवसा निमित्त साहित्य सारथी कला मंच यांच्या वतीने परिवर्तनवादी कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मराठी पत्रकार संघाचे मंत्रालयीन संपर्क प्रमुख नितीन जाधव म्हणाले की, सध्या राजकारणाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. लोकशाही ही दिवसेंदिवस ठोकशाही होत चालली आहे. या काळात जगदीश ओहोळ यांच्यासारखे व्याख्याते, कवी व्यवस्थेवर भाष्य करत आहेत तरी आता सर्वच कवी, लेखकांनी वास्तववादी साहित्य निर्माण करुन सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारे लिखाण करावे.
या देशातील प्रत्येक नागरीकांना जागरुक होण्याची व राजकारणाकडे दुर्लक्ष न करता त्यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
दैनिक टोला चे मुख्य संपादक मा. डॉ. बळीराम ओहोळ, जूनी पेन्शन हक्क संघटना चे राज्यअध्यक्ष मा. सागर शिंदे, सा. आमोदचे संपादक एम के जावळे, सुप्रसिद्ध गझलकार नवनाथ खरात, उद्योजक निलेश पाखरे, सिरम कंपनीचे पांडुरंग राऊत, डॉ.सचिन भिमकर, सामाजिक कार्यकर्ते, थेऊर पतसंस्थेचे संचालक दिलीप दादा लगड, लेखक बालाजी गायकवाड, प्रवीण भवाळ सर, किशोर चव्हाण, संदीप गायकवाड, पत्रकार प्रा.चैतन्य ओहोळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कविसंमेलनात चाळीसहून अधिक कवींनी विविध सामाजिक विषयावर परिवर्तनवादी कविता सादर करुन सर्वाना मंत्रमुग्ध केले. शहाजी वाघमारे, रुपाली भोरकडे, प्रा.मोहन रसाळ, कविता हाडवळे, गुलाबराजा फुलमाळी,रमेश जाधव, दिपीका कटरे, संगीता गव्हाणे, जोती ओहोळ, राजश्री वाणी, राहुल भोसले, चंद्रकांत जोगदंड, देवेंद्र गावंडे, लक्ष्मण शिंदे, सुवर्णा वाघमारे, उमाताई लाकडी, पल्लवी नाईक, धर्माधिकारी ताई व तानाजी शिंदे यांनी बहारदार रचना सादर करुन कविसंमेलनात शोभा वाढवली.
गझलकार नवनाथ खरात ,डॉ. प्रशांत पाटोळे, गझलकार अरुण कटारे, उर्दू गझलकार उद्धव महाजन सर यांनी बहारदार गझलेचा नजराणा पेश करीत रसिकांची वाहवा मिळवली.
व्याख्याते जगदीश ओहोळ वाढदिवसा निमित्त अशा प्रकारचे संमेलन म्हणजे तरुण पिढीला एक नवा आदर्श व पायंडा घालून दिल्याचे प्रांजळ मत साहित्य सारथी कला मंच चे संस्थापक कवी सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे बहारदार आणि सुमधूर सुत्रसंचालन प्रा.विजय अंधारे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश धोत्रे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत पाटोळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी शिंदे व केपीं पॅरामेडिकल स्टाफ यांनी परीश्रम घेतले.