July 1, 2025 7:37 am

अमळनेर भुयारी गटारींमुळे शहरातील रस्त्यांचा झाला सत्यानाश..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर भुयारी गटारींमुळे
शहरातील रस्त्यांचा झाला सत्यानाश..!

अमळनेर : विक्की उत्तम जाधव..
पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता रस्त्याचे महत्व जाणून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीनी या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी संपूर्ण अमळनेर शहरातील नागरिक करीत आहेत. पाच पावली पासून तर शिरुड नाका, वड चौक या भागात ही मोठया प्रमाणात पडलेत खड्डे पडले असून स्थानिक नागरिक संबंधित ठेकेदाराव आणि त्याच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

 

अवघ्या दीड महिन्यात डांबरी रस्त्यावर खड्डे पडून वाहने फसत आहेत. तर रस्ता डागडुजीसाठी कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. शहरातील सुभाष चौक ते रेल्वे स्टेशन हा नगरपालिकेसमोरील रस्ता दीड महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आला आहे.

त्यापूर्वी या रस्त्यावर भुयारी गटारीचे काम करण्यात आले होते. मात्र ठरल्याप्रमाणे भुयारी गटारीच्या ठेकेदाराने खोदलेल्या चाऱ्या व्यवस्थित दाबल्या नाहीत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!