अनुसूचित जातीचे कोट्यावधी रुपये अखर्चित… विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – अनुसूचित जातीचे कोठयावधी रुपये अखर्चित असूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे .तसेच
विद्यार्थी व शिक्षकांचे पुढील विषय प्राधान्यक्रमाने सोडवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , राज्याचे मुख्य सचिव ,शिक्षण तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे .
अनुसूचित जाती-जमातीची हजारो कोटीची रक्कम अखर्चित राहिली आहे ,याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी .
इयत्ता पहिली ते चौथीसाठी राबविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता योजनेचा निधी गेल्या ५ वर्षापासून उपलब्ध झाला नाही . याचप्रमाणे प्राथमिक
शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती , फ्री- शीप या योजनांचा लाभ मिळालेला नाही .परंतु हजारो कोटींचा निधी माघारी जातो याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी . विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमा लवकरात लवकर खात्यावर जमा करण्यात याव्यात .वसतिगृह ,निवासी आश्रमशाळा येथील सुविधांमध्ये वाढ करण्यात यावी . सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा .
” बार्टी ” पुणे येथील अनियमित कारभाराची चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी .
३ वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या योजनेची अंमलबजावणी करून इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90 % पेक्षा अधिक गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना ११वीसाठी एक लाख रूपये व १२वीसाठी एक लाख रुपये रक्कमा त्वरित देण्यात याव्यात .
जिल्हा परिषद शिक्षकांना पोलिसांप्रमाणे कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी .
मा .सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन राज्यातील मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा . शिक्षकांचा पगार दरमहाच्या एक तारखेला करण्यात यावा .
जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी .
सन २०/२१ मध्ये जिल्हा परिषद पुणे यांनी १२वी विज्ञान शिक्षकांची पदवीधर शिक्षक पदोन्नती केलेल्या शिक्षकांना बी.एस्सी. पदवी प्राप्त करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी द्यावा. संबंधित शिक्षकांचे रिव्हर्शन करु नये.
जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात यावी .
या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा.