महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन,’एक सही संतापाची’
सध्याच्या गलिच्छ राजकारणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी केल्या भरभरून सह्या.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड : राजकारणाचा चिखल झाला आहे का,मतदाराच्या मताला काही किंमत राहिली नाही का,एकदा मतदान केलं की तूम्हाला पाच वर्ष राजकारणी गृहीत धरतात का,या प्रवृत्तीचा तूम्हाला राग येत नाही का,चिड येत नाही का,संताप येत नाही का, जर येत असेल तर..
असा सवाल करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दौंड शहरात ‘एक सही संतापाची’ आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीचा सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड राग असून या किळसवाणं राजकारण पाहून महाराष्ट्रातील जनता संताप व्यक्त करत आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दौंड शहरात एक सही संतापाची आंदोलन उभारून सह्याची मोहिम घेण्यात आली. यावेळी या उपक्रमास दौंडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी शिवसेनेचे दौंड शहर संघटक अजय कटारे यांनी ठाकरे बंधूंना आता तरी एकत्र या अशी साद घातली. सर्व सामान्य जनता महागाईत होरपळत असताना राजकारणी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत ,आपल्या सहीला बोलतं करूया,मनातला संताप व्यक्त करूया. लोकशाही पायदळी तुडवणाऱ्यांना सहीव्दारे जाब विचारूया या आंदोलनात सामील होऊन सत्तापिपासू वृत्तीला धडा शिकवूया असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड तालुकाध्यक्ष सचिन कुलथे म्हणाले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड शहर अध्यक्ष संदिप बोराडे,मंगेश साठे, नंदकिशोर मंत्री,अक्षय साठे, आदेश धीरडकर,सुरज पाटील, अभिजीत गुधाटे, स्वप्नील शिंदे महिला आघाडीच्या लता बगाडे उपस्थित होते.तसेच असंख्य दौंडकर जनता उपस्थित होती.