तीस वर्षांनी भेटलेत शाळकरी मित्र
1993 च्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा पार पाडला प्रथम स्नेहसंमेलन मेळावा
प्रतिनिधी.संदीप कायगुडे
कर्जत. सन 1993 म्हणजे पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबिकानगर यांची शाळा सुरवातीची पहिलीच बॅच होती. तब्बल तीस वर्षानंतर या विद्यार्थ्यांना भेटण्याचा योग आला. दिनांक 08/07 2023 रोजी या विद्यार्थ्यी तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आले.आपल्या वर्गातील विद्यार्थी काय करत असतील किमान ते कोणत्या कामात असतील. त्यांच्याशी एकदा तरी भेटलं पाहिजे असा विचार या वेळच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
तशी त्यांनी महाविद्यालय प्राचार्य यांच्याशी संपर्क साधला. १९९३ सालच्या यावेळच्या शाळेची पहिले शिक्षक आणि प्राचार्य श्री कळस्कर सर यांच्याशी संपर्क साधला. महाविद्यालयाकडून शिक्षकांकडुन आपल्याला मिळालेले ज्ञान कायम आयुष्यभर उपयोगी आले आसे यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले. आमच्या १९९३ त्या शाळेच्या पहिल्या बॅचला शिक्षक तथा शाळेतील प्राचार्य कळस्कर सर यांनी सुद्धा खूप शिशेष सहकार्य केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणी उजाळाही दिला.
यावेळी बापू गावडे ,किरण मराळे,अर्जुन थोरात, बाळू कदम, आश्रू कदम ,प्रशांत चिरणे, मल्हारी साबळे, बाळू कारंडे, बाळू पाडुळे, किशोर गोसावी ,या माजी विद्यार्थ्यांसह अनुसया सुद्रिक-गावडे ,सुवर्णा भिताडे- खराडे, अक्का उदमले-सोनावले, आककासुद्रिक-गवळी, नीता ढवळे-दंगाडे ,मंदा गावडे-देशमुख ,ज्योती होलम-खिरीड आदी विद्यार्थ्यांसह शाळेचे प्रा.कळस्कर सर, प्रा.कदम सर, प्रा.जगताप सर,शिपाई माऊली (दादा) वाघमारे उपस्थित होते.
यातील काही शिक्षक लवकरच रिटायर होतील यामुळे हेच स्नेहसंमेलन विशेष ठरले.
यावेळी विविध माजी विदयार्थींनी शाळेतील आठवणीसह आपले मनोगत व्यक्त करत शाळेचे शिक्षक कै. रंधवे सर यांच्या आठवणींना उजळणी देण्यात आली.
प्रा.कळसकर सर,प्रा.जागताप सर,प्रा.कदम सर यानी विदयार्थींच्या जुन्या आठवणी उजाळणी देत पुढील जीवनास शुभेच्छा दिल्या.