शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता.शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूलमध्ये गुरुवार 3 जुलै रोजी गुरु पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्याला आहे अगाध ज्ञान
जो देई हे निस्वार्थ दान
गुरु त्यासी मानावा
देव तेथेची जाणावा
खरंच गुरुचे स्थान हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असते . गुरु म्हणजे अंधकाराला संपवणारा प्रकाशच होय. आपल्या भारत देशाला गुरुपरंपरेचा वारसा आहे .
गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणे ऐसे गुरु
चरण त्यांचे हृदया धरू
आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात गुरु मंत्राने व प्रार्थनेने झाली . शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय मेघा मुंगसे मॅडम यांचे स्वागत मुलांनी पुष्पगुच्छ देऊन केले .त्यानंतर सर्व शिक्षक -शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता चौथीच्याच्या विद्यार्थ्यांनीनी आपल्या गुरूंविषयी आदर व्यक्त करत एक सुंद