असत्य नाथाची रडकी कहाणी !
दोन पेन वापरतो, खासदार मुलाला हॉस्पिटल उभे करून दिले नाही ! गरीब बापाची कहाणी
मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही ! दुर्दैवी कुटुंब प्रमुख
पण मुलगा एमएस ऑर्थो झाला. एमएस व्हायच्या आधीच खासदारही झाला. बंगले गाड्या आल्या.मुलाकडे ३२ लाखाचे घड्याळ आहे.करोडोची मालमत्ता आहे.इतकी की इडीची वक्रदृष्टीही पडली होती परंतू कमळाबाईचे मिंधे झाल्याने फाईल बंद आहे.
श्रीकांतला हॉस्पिटल देऊ शकलो नाही ! किती दुर्दैवी पिता ?
आधी नगरसेवक मग दिघे साहेबांच्या दया धर्मामुळे व राजन विचारेच्या मेहरबानीने सभागृह नेता, २००४ पासून आमदार, कॅबीनेट मंत्री, विरोधी पक्ष नेता, वर्षभरापासून गद्दारीचे इनाम म्हणून मिळालेले मुख्यमंत्रीपद तरी पोराला हॉस्पिटल काढून देता आले नाही.१५० चौरस फुटाच्या चाळीतून ३ मजली बंगला बांधला, सोनं नाणं चल अचल मालमत्ता ओसंडून वाहते. मुलगा ९ वर्षे खासदार आहे. दरवर्षी वाढ दिवसाला बॅनर होर्डींगवर करोडो रूपये खर्च होतो. बीकेसीतील मेळाव्यासाठी एसटीला १० कोटी रोख दिले. इतर खर्च ३० -४० कोटी केला पण हाय दुर्दैव किती ? की पोराला दवाखाना टाकून देऊ शकले नाहीत.
माझ्याकडे दोन दोन पेन आहेत.मी कुठेही कधीही सही करतो.
हे तर खुपच मजेशीर.अहो, तुम्ही मुख्यमंत्री आहात की सह्याजीराव ? कधीही कुठेही कोणी सुज्ञ मानव सही करीत नाही. संपूर्ण वाचून व सत्यता पडताळूनच सही करायची असते.
नाही तर ध चा मा व्हायचा !
आणि दोन पेन कोण ठेवतं माहित आहे का ?
आमच्या शहरात दुकानात कोणी गि-हाईक आले तर दुकानदार दोन बोटांनी दोन इशारे करतात. पहिला चहा – अण्णा दोन चहा आण! म्हणजे खरोखर चहाआणायचा इशारा असतो. दुसरा इशारा दोन बोटं हलवत नाना चहा आण ! याचा अर्थ चहा आणू नकोस ! शेवटी चहा येत नाही, असे बघुन गि-हाईक कंटाळून निघुन जातो.
या दोन पेनची गंमत अशीच आहे. एक अण्णाचा व दुसरा नानाचा. विशिष्ठ पेनची शाई ओळखून अधिकारी काम करायचे की फक्त टोलवाटोलवी करायची हे समजून जातात. बिच्चारे आमदार, मंत्री व जनता मात्र साहेबांच्या औदार्यावर बेहद खुश असतात.साहेब वेळ – काळ बघत नाहीत.तत्परतेने कधीही व कुठेही सही करतात, याचेच गोडवे गात फिरतात. मात्र दुस-या शाईने मारलेली पाचर त्यांना दिसत नाही.ते अधिका-यांचा उद्धार व साहेबांचा जयजयकार करीत असतात.
(काही अधिकारी off the record सांगतात साहेब निधीच नाही तर काम कसे मंजूर करायचे ? त्यावर साहेब म्हणतात, आमच्याकडे आलेल्या कोणालाही आम्ही नाराज करू शकत नाही म्हणून सही करतो.निधी आहे की नाही, काम नियमात बसतं की नाही ? हे तुमचं काम आहे.तुम्ही ते का केलं नाही ? याचा जाब आम्ही कधीतरी तुम्हाला विचारतो का ? तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करतो.जनतेला आमचं सरकार निर्णय घेण्यात वेगवान आहे, असं दिसलं पाहिजे म्हणजे झालं.)
आनंद दिघेंचा पट्टशिष्य आनंद आश्रमवरील दिघे साहेबांचे नामोनिशाण मिटवतो, परवा तर हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या प्रतिमेवर घाव घालत २० वर्षापुर्वीची मातोश्री जवळील शाखा तोडायला लावली, ठाकरे कुटुंबीयांचे संरक्षण कमी केले, पुन्हा इडीचे दबाव तंत्र वापरणे सुरू झाले आहे. महिला पदाधिकारींना आतिता लक्ष्य केले आहे. कायते ढुंगण काय तो दांडा म्हणणारी आधीच पळवली आत्ता नासकी का(यं)दे पळवली.
याला सत्तेचा माज म्हणावं कि ग्रांड मस्ती की दिल्लीतील आलाकमानची जी हुजरेेगिरी की आणखीन काही !
जगात जर परमेश्वर असेलच तर तो अशा नराधमांना कधीच माफ करणार नाही.त्याने जर माफ केले तर मात्र आम्ही त्याला देव मानणार नाही !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
२४ जून २०२३
टीप : मालवणी माणसाचा शाप काम करतोच.