उल्हासनगरचा एक बदनाम अधिकारी !
आजवर उल्हासनगर महापालिकेत हजारो कर्मचारी व अधिकारी होऊन गेले.1960 साली उल्हासनगर नगरपालिकेची स्थापना झाली.आज 62 वर्षाचा कालावधी लोटला परंतू
वादग्रस्तपणा,बदनामी, घोटाळेबाजी,
बनवेगिरीत सद्या निलंबित असलेला जनसंपर्क अधिकारी युवराज धोंडू भदाणे याचा विक्रम कोणी या आधी मोडला नाही व पुढील दहा हजार वर्षात कोणी मोडू शकणार नाही.
या अधिका-याचा उल्लेख मी एकेरी करतो कारण त्याचा सन्मानाने उल्लेख करावा असा एकही गुण मला त्यात आढळला नाही.2003 साली तो महापालिकेत रूजू झाला तेच बोगस व बनावट जन्म दाखल्याच्या बळावर !नेमणूकीच्या वेळीच तो अपात्र होता.त्याचा परिविक्षाधीन कालावधी दोन वेळा वाढवला गेला.त्याची बौद्धिक क्षमता नसल्याचा निर्वाळा तत्कालीन अधिका-यांनी दिला होता. नेमणूकी नंतर त्याच्या विरोधातील तक्रारी सुरू झाल्या त्या आजतागायत थांबता थांबत नाहीत.
2007 साली त्याला एका प्रकरणात पाटणकर समितीने दोषी ठरविल्याने बडतर्फ करण्यात आले होते.या पठ्ठयाने शक्कल लढवत न्यायालयातून स्थगन आदेश मिळवला तो गेली 15 वर्षे उठवला गेला नाही,हे प्रशासनाचे अपयश म्हणावे कि संगनमत ? याचे 3 वेळा निलंबन झाले परंतू लोकप्रतिनिधी व प्रशासनावर दबाव व मॅनेज तंत्र वापरुन तो पुन्हा पुन्हा रूजू होतो व त्याची शेपुट पुन्हा वाकडीच राहते. याने तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना ब्लॅकमेल करून अकरा वर्षांचा गोपनीय अहवाल अ+ अत्युत्तम असा मिळवला.वैयक्तिक अँट्रासिटीच्या गुन्ह्यात बचावासाठी वकिलांच्या फि पोटी सात लाख रूपये मिळवले. आमदार,खासदार व मंत्रालयात ओळखी वाढवून ( त्या दिल्या घेतल्याशिवाय वाढत नसतात,हे वेगळे सांगायला हवे का ) तो आपला कार्यभाग साधत असतो. ज्या महापालिकेने त्याला रोजगार दिला त्या महापालिका विरोधात एक दोन नव्हे तर 22 याचिका दाखल करून महापालिका निधीचा गैरवापर करून प्रशासनास जेरीस आणले.
महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकारी अधिका-यांविरोधात त्यात आयुक्त,
अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महापालिका सचिव, सामान्य प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व कर्मचा यांविरोधात याने खोट्यानाट्या तक्रारी केल्या आहेत. सुनील वाघेला, लिंबा पाटील सारख्या कर्मचा-यांना दमदाटी करण्यात त्याला काहीच वाटत नाही.विनयभंगाच्या तक्रारी महिला आयोगाकडे गेल्या, एका महिलेने तर याला महापालिकेत थोबाडीत मारल्या होत्या
या बदमाश अधिका-याने महापालिकेच्या सर्व विभागांचे बनवून घेतलेले रबरी शिक्के, मंत्रालयात उपायुक्त दर्जाचा अधिकारी असल्याची बनवलेली बोगस शासकीय ओळखपत्रं, 350 फाईली याच्या दालनातून जप्त करण्यात येऊन 2018 साली निलंबित करण्यात आले होते. परंतू लोकप्रतिनिधींना मॅनेज करून तो पुन्हा रूजू झाला.त्याची विभागीय चौकशी करणा-या काळे बिडवे या जोडगोळीसही त्याने त्याला क्लीनचिट देण्यास प्रवृत्त केले. परंतू माझ्या आक्षेपानंतर आयुक्तांनी सदर मॅनेज केलेला अहवाल फेटाळला व नव्याने सदाशिव बेनके यांना चौकशी अधिकारी नेमुन निष्पक्ष चौकशी केली असता तो दोषी आढळला.त्याने पुन्हा न्यायालयात धाव घेतली व तारीख पे तारीख मुळे ते प्रकरण रेंगाळत ठेवले. साच दरम्यान त्याचे सेवा पुस्तक गहाळ गेल्या सहा महिन्यांपासून झाल्याचा फतवा तत्कालीन उपायुक्त संतोष देहेरकर यांनी काढला होता. नगर पालिका व महापालिकेच्या गेल्या 62 वर्षाच्या इतिहासात एखाद्या कर्मचारी वा अधिका-याचे सेवा पुस्तक गहाळ होण्याचा हा एकमेव चमत्कार होता.नंतर ते सेवा पुस्तक भदाणे महाराजाच्या चमत्काराने पदोन्नतीच्या प्रकरणात प्रगट झाले,असा हा महाबदमाश अधिकारी !
या नंतर तरी याने सुधारावे तर तेही नाही. मी लावून धरलेल्या बनावट जन्म दाखला व बनावट पीएचडी प्रकरणी आयुक्तांवर दबाव आणून ते दडपण्याचा अतोनात प्रयत्न केला.माझ्या नेतृत्वाखालील अन्याय विरोधी संघर्ष समितीने 2018 पासून या बदमाश अधिका-या विरोधात जंग जंग पछाडले,अनेक वेळा उपोषणं व आंदोलने केली अखेर आयुक्तांनी केलेल्या सुनावणीत भदाणे याचा जन्माचा पुरावा असलेले स्कुल लिव्हिंग सर्टिफिकेट बोगस व बनावट असल्याचे सिद्ध करण्यात मला यश आले.त्याच प्रमाणे मी आव्हान दिलेली कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीची पीएचडीची डिग्रीही बोगस असल्याचेही निर्विवादपणे सिद्ध केले. त्यामुळे या बदमाशावर बनवेगिरी,फसवणूकीसाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला.
याच दरम्यान भदाणेने आपल्या पदाचा गैरवापर करीत एका गरजू महिलेस महापालिकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तुर्भे येथील एस.पी. लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला.या लॉजवर त्याने दिलेले आधार कार्ड बनावट असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्या प्रकरणातही तो फरारच राहिला.
वरील दोन्ही प्रकरणी त्याला अनुक्रमे कल्याण व ठाणे सत्र न्यायालयांनी अटकपूर्व जामीन नाकारला.परंतू या बिलंदराने मुंबई उच्च न्यायालयातून आठवड्याच्या अंतराने अटकपुर्व जामीन मिळवला.तो कसा मिळवला हे सांगितले तर न्यायालयाचा अवमान होऊ शकतो,म्हणून गप्प बसावे लागत आहे.
असा या अकार्यक्षम, बौद्धिक क्षमता नसलेला, अधिकारी व कर्मचा-यांना त्राही भगवान करणारा, न्यायालय व भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहका-याने जीवदान मिळवणारा बदमाश अधिकारी उल्हासनगरचा कलंकित अधिकारी आहे.एवढ्यावरच याचे भादराण संपत नाही.याने आपल्या जन्म गावी जळगाव येथील ग्रामपंचायतीतून कैलास मोरे या ग्रामसेवकाशी संगनमत करून मुळ जन्म रजिस्टरमध्ये भाऊसाहेब या नावाला कंस करून व खाली वेगळ्या शाईत खाडाखोड करून “युवराज” हे नांव समाविष्ट करून त्याचा जन्म 15 मे 1970 रोजी झाल्याचे प्रमाणपत्र मिळवून ते पुरावा म्हणून चौकशीच्या वेळी सादर केले. तसा अहवाल संबंधित सर्व अधिका-यांनी देऊनही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील आहोत. या बदमाशाचा बचाव करण्यासाठी काही गद्दार प्रयत्न करीत आहेत.
असा अधिकारी उल्हासनगर महापालिकेत कलंक आहे त्याची बडतर्फी होण्यातच शहराचे हित आहे.
दिलीप मालवणकर
9822902470