उरुळी कांचन मध्ये प्रथमच सेल्फी पॉईंटचा यशस्वी प्रयोग
प्रतिनिधी :- विशाल भिंताडे
सध्या शहरात, गावात सगळीकडे सेल्फी पॉईंटचे वेध लागले आहेत. गावचा चौक, पेट्रोल पंप, हॉटेल इत्यादी सगळीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉईंट बनवले जातात. त्याच धर्तीवर उरुळी कांचन गावामध्ये पहिल्यांदाच सेल्फी पॉईंट बनवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध व विश्वसनीय नाव असणाऱ्या निर्माण डेव्हलपर्स तर्फे हा सेल्फी पॉईंट श्री दत्त पार्क, दत्तवाडी येथे बनवण्यात आला आहे.
निर्माण डेव्हलपर्स कायमच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सोयी- सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातूनच ही कल्पना सुचल्याचे ते सांगतात. हा सेल्फी पॉईंट विहिरीवर बसवण्यात आला असून सध्या गावातील ग्रामस्थांचे आकर्षण बनले आहे. रोज अनेक लोक येऊन तिथे सेल्फी, फोटो घेत असतात.
आम्ही व्यवसाय करत असताना कायम ग्राहकांचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील यावर काम करत असतो, असे निर्माण डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा निखिल कांचन व सचिन कांचन यांनी सांगितले. त्यांनी सुरु केलेल्या श्री दत्त पार्क या नवीन प्रोजेक्ट्मध्ये सुद्धा त्यांचा यावरच भर असून त्यातूनच या सेल्फी पॉईंटची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले.