June 29, 2025 3:34 pm

आपला नेता भ्रष्टाचारी असला तरीही….!

अपनी भाषा में पढ़े! Translate

आपला नेता भ्रष्टाचारी असला तरीही….!

राजकीय पक्ष म्हणजे समविचारी राजकीय लोकांची संघटना.सांगतांना मुख्य हेतू सांगतात कि आम्ही जनतेची सेवा करणार आहोत.८०टक्के समाजकारण आणि २०टक्के राजकारण.पण तसे काही खरे नसते.१००टक्के अर्थकारण च करतात.त्यासाठीच राजकारण करतात.पण प्रत्यक्षात ते जनतेची,सरकारची लुटमार करीत असतात.तसे नसते तर आपला आमदार, खासदार मंत्री पांच वर्षात इतका गब्बर झालाच नसता.म्हणजे हे सर्रास चोरी करतात.ज्याला हे कळत नसेल तो मुर्ख असेल. त्यांनी मतदानाला जाऊच नये.ज्याला मान्य नसेल तो तर बदमाश असेलच.तो सराईत गुन्हेगार असेलच.
आपला पक्ष,आपला नेता काय चोरी करतो,कुठे कुठे लफडे करतो हे त्या पक्षातील सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी व उपनेत्यांना माहिती असतेच.पण ते सुद्धा खाली मान घालून ढेप खातात.सांगतात,तसे सांगता येत नाही.आपण त्याबाबत बोलू शकत नाही.ती वरच्या लेव्हलची गोष्ट आहे.गब्बलसींग ने बसंतीवर बलात्कार जरी केला असता तरीही सांभा किंवा काल्याने गब्बर ला विरोध केलाच नसता.गोळी घातलीच नसती.तसेच राजकीय पक्षातील दुसऱ्या तिसऱ्या फळीतील लोकांचे असते.साहेबांविषयी आपण काय बोलणार,कसे बोलणार अशी मखलाशी करून मुक संमती देतात.आपण कितीही जबरदस्तीने बोलते करण्याचा प्रयत्न केला तरीही ते कौशल्याने वेळ मारून नेतात.जास्त आग्रह केला तर ते आपला फोन घेणे टाळतात.बोलणे टाळतात.च्या,आयला! नेत्यांनी चोरी करावी,लफडे करावे आणि आपण स्पष्टीकरण देत बसावे.त्यापेक्षा या काकाशी बोलणे टाळलेले बरे.
मला वाटते ,असा कोणी प्रामाणिक माणूस पक्षाचा सदस्य, कार्यकर्ता , पदाधिकारी,उपनेता असला तरीही साफ साफ बोलू शकतो कि,हे असे असे लफडे आहे. असे असे त्रांगडे आहे. आम्हाला नाही आवडत.सांगून पाहू.नाही ऐकले तर वरच्या स्तरावर बोलू.राजकिय पक्षात पार्टी लाईन असली तरीही असे कोणी नरडीवर गळफास लावून ठेवत नाही.बोलले पाहिजे.किमान इनडोअर तरी बोलले पाहिजे.सभ्यतेने तरी बोलले पाहिजे.भाऊ,हे असे नका करू.
जळगाव शहरातील ४९ रस्ते डांबरीकरण करण्याची एकच वर्क ऑर्डर दिली.असे करणे चुकीचे आहेच,बदमाषी सुद्धा आहे.ही बदमाषी पालकमंत्री गुलाबराव ने केली का?ही बदमाषी आमदार भोळेंनी केली का?ही बदमाषी सा.बां.अभियंता सोनवणेंनी केली का?याचा शोध घेणे चालू आहे.यातील चार रस्ते आत्ताच बनत आहेत.अजून कम्प्लीशन सर्टिफिकेट सुद्धा नाही.तोपर्यंत १००कोटी आणखी रस्त्यांसाठी मिळाले.मागील आठ वर्षांपासून हा बॅकलॉग भरून काढायचा आहे.यासाठी पालकमंत्री किंवा आमदाराला जास्त घाम गाळण्याची गरज नाही.पण ते सांगतात,तसे.आता यातील चार रस्त्यांचे डांबरीकरण वर सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे ठरत आहे. बाळंतपण अपुरे असतांना पुन्हा हे गरोदरपण का?अशी बदमाषी जळगाव शहरात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.आम्ही आमदार भोळेंना सक्त ताकीद दिली कि,मामा, तुम्ही या फंदात पडू नका.आज सरकार तुमच्या चोरांचे आहे‌.उद्या विरोधातील चोरांचे बनले तर तुम्हाला धुळे जेलमध्ये जावे लागेल.तेंव्हा गिरीश महाजन किंवा गुलाबराव पाटील फक्त भेटीला येऊन सान्त्वन करतील.आमदार भोळेंना मात्र आधीच समक्ष भेटून सावध केले आहे.पांच टक्के कमिशन असेही मिळणार आहे,तसेही मिळणार आहे.तर मग,जोखीम नको.
सुरेश जैन यांना कधीच वाटले नव्हते कि, घरकुल निधीचे सहा कोटी रूपये आपल्याला दहा वर्षांनी जेलपर्यंत पोहचवतील.त्यांचेकडे एकही माणूस नव्हता कि,तो जैन यांना सांगेल कि,दादा,असे नका करू.सहा कोटी गुमान नगरपालिकेला परत करा.सर्वच भाकरभाऊ होते.पाव बटर वर नजर ठेवून होते.अशी माणसे कशाला सल्ला देतील? जैन जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा एकही अनुयायी नेता बनला नाही.तशी त्यांची कुवत नाही किंवा जैन यांनी मुद्दामच भाकरभाऊ पाळले असावेत.रोटी डालो तो,पुंछ हिलानेवाला चाहिये!
एकनाथ खडसे कुरूक्षेत्रावर भेटले.चाक चिखलात अडकले होते.म्हटले,नाथाभाऊ दोन चार माणसे अशी ठेवा ,जे घरुन जेवण करून येतील.घरचे अन्न खाल्लेले असतील तर तुम्हाला सांगतील कि,भाऊ,असे नका करू.आपल्याला महागात पडेल.पण भाऊंनी सगळेच भाकरभाऊ सोबत ठेवल्याने त्यांनी भाऊंच्या प्रतिमेकडे नाही,खिशाकडे लक्ष ठेवून होते.नेता कितीही मोठा असला,लंगर चालवत असला तरीसुद्धा त्याला चांगले वाईट सांगणारा कोणीतरी सरदार असावा.नसेल तर ही अवस्था टाळता येत नाही.
जळगाव जिल्ह्यातील आता गुलाबराव चा घोडा अश्वमेघ यज्ञात मोकळा फिरत आहे.म्हणे माझा घोडा जो कोणी अडवील त्याच्याशी मी युद्ध करीन.म्हणे माझा घोडा ठाकरेंच्या सभेत घुसळून धुडगूस घालील.दगडे मारून आम्ही सभा उधळू शकतो.तसा आमचा दिर्घ अनुभव आहे.या गुलाबराव चा घोडा स्वपक्षातील एकानेही अडवला नाही.ठाकरेंची सभा,शक्ती पाहून तो घोडा जळगाव ते पाचोरा रस्त्यावरून परत फिरला.बरे झाले, आमदार किशोर पाटील यांनी त्यांचा घोडा रायसोनी कॉलेज जवळच अडवला.मुखवटे उचकवून पाहिले तर यात एकही घोडा नव्हता.
आमदार किशोर पाटील यांनी चांगली भुमिका घेतली.माझ्या गावात ठाकरे साहेबांची सभा असली तरीही माझे माझ्या काकांशी इमान आहे.मी काकांशी बेइमानी करणार नाही.कोणाला करू देणार नाही.अशा समझदार आमदाराला मंत्री पद देऊन शिंदेंनी जळगाव चे पालकमंत्री बनवले पाहिजे.असेही गुलाबराव नखशिखांत भ्रष्टाचारात बुडालेले आहेत.बदनाम झालेले आहेत.ते शिंदेना सुध्दा घेऊन बुडवतील.डुबेंगे,मगर आपको भी ले डुबेंगे सनम!
तिकडे बुलढाणाचे नागरिक त्यांना मेणबत्ती लावून शोधत आहेत.त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच अड्डे,कोठे,मैफिली,मुजरा,बैठकी,तमाशे,जलसे हुडकून पाहिले.कोणी आमचा पालकमंत्री गुलाबराव पाहिला का? दाखवा आणि बक्षीस घ्या!
माझे अपील नेहमीच बुद्धी ज्ञान आणि नीती असलेल्या लोकांना असते.अशीच दयनिय परिस्थिती छत्रपतींचे स्वराज्य स्थापनेपुर्वी होती.छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्यांनी आता छत्रपतींची भुमिका घेतली पाहिजे.फक्त पुतळे बनवून त्याच पुतळ्याच्या आड गुन्हेगारी लपवण्याची क्रिया थांबवली पाहिजे.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!