“जळगाव सपकाळ येथे विज पडुन गाय आणि बैलाचा मृत्य”
अचानक आलेल्या पावसामुळे गहु हरभरा पिकाचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
भोकरदन प्रतिनिधी डाॅ. संजीव पाटील भोकरदन :-तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे शुक्रवारी चार वाजेदरम्यान विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली; मात्र या पावसाने येथील शेतकरी साहेबराव मोरे यांच्या शेतातील जनांवराच्या गोठ्यात वीज कोसळल्याने गाय व बैलाचा मृत्यू झाला असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. जळगाव सपकाळ येथे पावसासह हरभऱ्याच्या आकाराएवढी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हरभरा, गहु पिकांचे नुकसान झाले आहे तसेच झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह अर्धा तास पाऊस झाला.