दौंड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी
आमदार राहुल कुल यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – पुणे जिल्ह्यासह संपूर्ण दौंड तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला असून त्यामुळे शेतकरी राजाचा हातातोंडाशी आलेला गहू,कांदा,आंबा,द्राक्ष, डाळींब अशा अनेक प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे तसेच वीटभट्टी धारक,व्यावसायिक,यांचेही प्रथमदर्शनी नुकसान झाल्याचे दिसून येत आहे
तरी दौंड तालुक्या सह पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी आणि व्यावसायिक यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात अशी मागणी व विनंती चे निवेदन तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.