गद्दारांच्या नशिबी आशिर्वाद नव्हे
तर शिव्याशापच आहेत !
खेडच्या सभेने गद्दारांना उखडून टाकले. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणा-यांचे तोंड काळे झाले. ठाकरे शिवाय शिवसेना महाराष्ट्रच काय देश- परदेशातही कोणी मान्य करणार नाही. निवडणूक आयोग हा केंद्राचा बटिक झाला आहे, हे त्यांनी आपल्या पक्षपाती व असंवैधानिक निकालाने सिद्ध केले आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया सदोष असल्याचेच जाहिर केले.
निवडणूक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य निवडण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते व सरन्यायाघिशांची समिती असावी,असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला व चुना लगाव आयोगाला जोरदार चपराकच लगावली.
याच निवडणूक आयोगाच्या तुघलकी निकालामुळे मिंधे गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले गेले.हा निर्णय घटनातज्ज्ञां
प्रमाणेच सर्वसामान्य जनतेसही रूचलेला नाही.*आता हेच गद्दार शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याबद्धल जनतेचा आशिर्वाद यात्रा काढत आहेत. यात मिंधे गटाचे बाप व इडीग्रस्तच सामिल होत आहेत. यांना जनता आशिर्वाद देणे सोडा शिव्याशापच देत आहे. आमदार बच्चुकडू यांना याचा कडू अनुभव आलेलाच आहे.
जनतेने तुम्हाला का म्हणून आशिर्वाद द्यावेत? महाराष्ट्राची “अस्मिता” शिवसेना फोडण्याचे पातक केले म्हणून त्यांनाआशिर्वाद हवेत का ? हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेला वटवृक्ष तोडण्या
साठी भाजपाच्या कु-हाडीला ५२ दांडे दिले म्हणून आशिर्वाद द्यायचे का ? बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या गंभीर आजारपणाचा गैरफायदा घेत कपटीपणाने पाठीत वार केला,म्हणून या गारद्यांना महाराष्ट्राच्या जनतेने आ़शिर्वाद द्यायचे ? की महाराष्ट्राची अस्मिता दिल्ली दबारात गहाण ठेवत, त्यांचे तळवे चाटल्याबद्धल महाराष्ट्राने यांना आशिर्वाद द्यायचे ? पेट्रोल,
डिझेल, गॅस सिलिंडरचे दर प्रचंड प्रमाणात वाढवल्याबद्धल या गद्दारांना आशिर्वाद द्यायचे ? निष्ठावंत शिवसैनिकांना ब्लॅकमेल करून आपल्या गटारात ओढणा-यांना आशिर्वाद द्यायचा ? महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देणारे उद्योग गुजरातमध्ये नेल्याबद्धल यांना आशिर्वाद द्यायचे का ?
या गद्दारांना इतकेही कळत नाही की, आशिर्वाद हे भीक मागून मिळत नाहीत.ते जनतेच्या अंत:करणातून उत्स्फूर्तपणे मिळत असतात. सत्कर्म केले तर आशिर्वादाची भीक मागावी लागत नाही. कोणताही साधू,संत,
महात्मा वा सत्पुरूष कधीच आ़़शिर्वादाची याचना करीत नाही.
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना आशिर्वाद देत आहे.
त्यांनी कोणतीही आशिर्वाद यात्रा न काढता घरबसल्या त्यांना आशिर्वाद मिळत आहेत. गद्दारांना कधीच आशिर्वाद मिळत नाही,मिळते ती फक्त शिक्षा. नियतीच्या दरबारात लाच-वशिला चालत नाही व ती कघीही उधारी ठेवत नाही.त्यामुळेच धर्मवीर बोलून गेले-गद्दारांना क्षमा नाही !
महाराष्ट्रात पदवीधर व शिक्षक मतदार संघातील सुशिक्षित मतदारांनी या गद्दारांसह त्यांच्या बापाची कशी धुळधाण उडवली हे नुकतेच महाराष्ट्राने पाहिले. तरी यांना आशिर्वाद हवेत ? भाजपचा २८ वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला कसबा मतदार संघ डोळ्यासमोर ढासळला ! तरी हे म्हणतात-आम्हाला आशिर्वाद द्या ?
वरळीला मुख्यमंत्र्यांच्या जाहिर सभेचा जगजाहिर फियास्को झाला ! तरी हे म्हणतात आम्हाला आ़शिर्वाद द्या ? त्याच ठिकाणी आदित्य ठाकरेंची प्रचंड जाहिर सभा झाली.यावरून जनतेचा आशिर्वाद कोणाला आहे ? हे या गद्दारांना कळत नाही का ?
नुकतीच खेडमध्ये पार पडलेली अतिविशाल जाहिर सभा हेच सिद्घ करते की,निवडणुक आयोग कि चुना लगाव आयोगाने काहीही निकाल देवो,जनतेचा आशिर्वाद उद्वव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहे.
*गद्दारांच्या नशिबी आशिर्वाद नसतात ; असतात ते फक्त तळतळाट व शिव्याशाप. त्यांचा राजकिय कडेलोट करूनच महाराष्ट्राची जनता दाखवून देईल की आशिर्वाद कोणाला व शिव्याशाप कोणाला ?*
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०