June 30, 2025 11:42 pm

ॲड.रोहिनीताईंचा रुद्रावतार…

अपनी भाषा में पढ़े! Translate

काल दि.०३रोजी मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या विविध अडचणी,कापसाचे व कांद्याचे घसरलेले भाव,केळीवरील सीएमव्ही व नुकसान भरपाईचे प्रलंबित अनुदान,यांसह विविध मागण्यांसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मुक्ताईनगर,बोदवड व रावेर तालुक्यातून अनेक शेतकरी,पदाधिकारी उपस्थित होते.

मोर्चाला संवेदना फाउंडेशनच्या कार्यालयापासून बैलगाडीवरून सुरुवात झाली व तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.या वेळी जिल्हाध्यक्ष ऍड.श्री रवींद्रभैय्या पाटील,माजी आमदार श्री अरुण दादा पाटील,माफदा चे प्रदेशाध्यक्ष श्री विनोदभाऊ तराळ,श्री सोपान पाटील,श्री ईश्वर रहाणे यांसह दोन्ही तालुक्यातील अध्यक्ष श्री यु डी पाटील सर,श्री आबा पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक पदाधिकाऱ्यांचे दोन-तीन मनोगते झाल्यावर राष्ट्रवादीच्या युवानेत्या ऍड सौ रोहिणीताईंनी माईक हातात घेत अगदी कडक आवाजात “जय जवान जय किसान” चा नारा देत राज्यसरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.ऍड.रोहीणीताईंनी कापसाचे भाव,केळीच्या पिकविम्यासाठी जिओ टॅगिंगसाठी होत असलेला शेतकऱ्यांचा छळ,कांद्याचे गडगडलेले बाजारभाव,शेतीचे वीज कनेक्शन तोडणे,लंपी आजारात दगावलेल्या गुरांच्या मालकांना न मिळालेली मदत,मेंढोळदे गावात झालेल्या नुकसान भरपाईची मागणी,मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने आदी विषयांचा जोरदार समाचार घेतला.त्यांच्या भाषणातील मुद्दे अभ्यासपूर्ण तर होतेच पण त्यापेक्षाही मुद्दे मांडण्याचे कसब अधिक उठावदार ठरले.त्यांच्या भाषणातून शिंदे सरकार व भाजपाची लक्तरे त्यांनी अक्षरशः वेशीवर टांगली.विद्यमान आमदारांचे नाव न घेता अनेक मुद्द्यांवर टीकेची झोड उठवली.भाषणातील मुद्दे व चढउतार अंगावर अक्षरशः शहारे आणणारे होते. भाव न मिळाल्याने पडून असलेल्या कापसामुळे होणारे खाजरे व सी एम व्ही चे शेतीतील तांत्रिक मुद्दे त्यांनी अभ्यासपूर्ण हाताळले आणि शेतकऱ्यांच्या घरात असलेली परीस्थिती त्यांनी वस्तुतः मांडली. शेतीविषयक व शेतकऱ्यांच्या समस्यांवर अडचणींचा पाढा वाचतांना त्या अनेकदा भावुक ही झाल्या तर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतांना त्यांचा आवाज चढून तीव्र भावना व राज्यसरकार विरोधातील रोष ऐकताना अंगावर शहारे येत होते.त्यातच एका शेतकऱ्याने चक्क पेट्रोलची कॅन हातात घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यावर त्यांचे डोळे पाणावले.एकीकडे राज्य सरकारला धारेवर धरणारा दुर्गावतार तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांविषयीची तळमळ,घालमेल त्यांच्यातील नेतृत्व प्रगल्भता दर्शवित होती.

या आधी जनसंवाद यात्रेत रोहिणीताईंना अनेकदा ऐकले मात्र कालचे जन आक्रोश मोर्चाचे भाषण मात्र चक्क केंद्र व राज्य सरकार विरोधातील शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश व्यक्त करणारे ठरले.त्याचबरोबर शेतकरी,कष्टकरी सर्वांच्या व्यथा प्रत्यक्ष दारात जाऊन त्या पाहत असल्याने आपसूकच त्यांच्या भाषणात ठळकपणे सर्व मुद्दे शब्दातीत झाले.एक मात्र खरे कालच्या भाषणावेळी आक्रमक भाषणाची लकब लोकनेते आदरणीय आ.श्री नाथाभाऊंच्या पद्धतीची होती हे अधोरेखित झाले आणि कार्यकर्ता म्हणून एक भाषण शैली व प्रगल्भ नेतृत्वात काम करीत असल्याचे जाणवले आणि अभ्यासपूर्ण भाषणाची मांडणी अनुभवायला मिळाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!