गणेशवाडी मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
एकच रात्री तीन चोऱ्या
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:गणेशवाडी गावामध्ये चोट्यांनी एकाच रात्री तीन चोऱ्या केल्याने गावकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या दोन तीन च्या दरम्यान विठ्ठल कायगुडे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम 70000 चोरून नेली. यानंतर चोट्यांनी आपला मोर्चा गावातील खताळ वस्तीकडे राहत असलेल्या भाऊ खताळ यांच्या घरामधील वयस्कर व्यक्तीला चाकूचा दाखवत घरातील 20000 रोख रक्कम व दोन तोळे सोनं चोरले त्यांच्यानंतर शेजारी राहत असलेले संपत श्रीराम यांच्या घरातील काहीशी रक्कम व सोने चोरून चोरटे पसार झाले.
यानंतर गावातील काही नागरिकांनी चोरट्यांनी पाठलाग केला. परंतु त्यांनी गुन्ह्यात वापरलेली टु व्हीलर गाडी ती तशीच सोडून देत स्वतःचा जीव वाचवण्याचा पळ काढला व ते त्यात यशस्वी झाले. पुढे करमणवाडी येथील महारनवर यांची टु व्हीलर गाडी त्यांनी चोरली व त्या गाडीवर तिथुन पसार झाले.
पोलिसांना ही माहिती गावकऱ्यांनी ताबडतोब देताच अत्यंत तातडीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांची टीम गणेशवाडीतील झालेले चोरीचा प्रकार प्रत्यक्ष बघत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा केला.
पोलीस निरीक्षक यादवसह सरपंच विलास कायगुडे यांनी नागरिकांनी ग्राम सुरक्षा दलाचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा आसे आवहान केले आहे.