जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे ग्रामीण भागातील विकास रखडला:इच्छुकांची जय्यत तयारी
(निलेश गायकवाड )
भिगवण :ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार महिनाभर उडेल असेच वाटत होते. परंतु या निवडणुकांच्या बाबतीत अद्यापही सर्व काही शांत आणि अलबेल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होणार तरी कधी असा सवाल आता सर्वसामान्य उपस्थित केला जात आहे. त्यातच या निवडणुकांकडे इच्छुकांची देखील डोळे लागले आहेत.
अनेक इच्छुकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्यालाच उमेदवारी मिळणार या हेतूने सर्व प्रकारचे जय्यत तयारी करून ठेवली आहे. लग्न समारंभ,वाढदिवस,जागरण गोंधळ व इतर सर्वच छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना निमंत्रण मिळताच अगदी वेळेत हजेरी लावणे सुरू ठेवले आहे. तसेच व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्राम सारखे सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग करून मतदार संघात संपर्कही वाढवत आहेत. परंतु सरकारच्या माध्यमातून या निवडणुका संदर्भात काहीच निर्णय होत नसल्याने इच्छुकांच्या नजरा आता निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे लागल्या आहेत.
राज्यात सहा महिन्यांपूर्वी ठाकरे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्याबरोबर जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या संख्येचा निर्णय बदलण्यात आला. मंत्रिमंडळांना जिल्हा परिषद गटांची रचना सन 2017 मधील निवडणुकाप्रमाणे ठेवण्याचा निर्णय घेतला शासन पातळीवरील गुंतागुंतीमुळे मुदत संपवणे या निवडणुका वरचेवर लांबत आहेत.
ग्रामीण भागातील गावांच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांकडे पाहिले जात आहे. मात्र सरकारच्या या वेळ काढून धोरणामुळे निवडणुका लांबीवर पडल्याने आता याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे.यामुळे अनेक विकास कामे ठप्प झालेली आहे तर अनेक इच्छुकांना राजकीय निर्णय घेणे अवघड बनले आहे. या निवडणुका केव्हा लागतील याविषयी अजून तरी सर्वत्र शांतताचा हा दिसत आहे त्यामुळे प्रशासनाने या ओळखतात निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.