प्रसिद्धी माध्यमांची डबल ढोलकी
शिवसेनेचे फायरब्रांड नेते संजय राऊत यांच्या अटकेस जामीन मिळून 103 दिवसांनंतर सुटका झाली.त्याबरोबर पेड मिडियाची कोल्हेकुई सुरू झाली. “जहाल बोलणारे राऊत मवाळ झाले” या मथळ्याची बातमी सतत दाखवली जात आहे.
जेलमध्ये असताना संजय राऊत वर टीकेची झोड उठवणारी पेड मिडिया न्यायालयाने इडीला झोडपून काढत राऊत यांची अटक बेकायदेशीर व अनाठायी असल्याचे निष्कर्ष काढून सुटकेचे आदेश दिले.न्यायालयाने दिलेल्या आदेशाची उहापोह करून मिडियाने सत्ताधारी ईडी सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याऐवजी संजय राऊत यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम मिडिया करीत आहे. जो माणूस खासदार आहे,शिवसेनेचा नेता आहे व ज्येष्ठ पत्रकार आहे तो 103 दिवस जेलमध्ये एकांतात राहिलेल्या संजय राऊत यांच्याबद्दल सहानुभूती दाखविण्या ऐवजी संभ्रम निर्माण केला जात आहे. ही मिडियाची डबल ढोलकी वृत्ती आहे.संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयानेच जाहिरपणे निकालपत्रात सांगितले आहे,त्याबद्दल ईडी वा मिंधे सरकारला जाब विचारण्याऐवजी राऊत मवाळ झाले, असे भासविण्यात येत नाही. चित्रा वाघने संजय राठोड बद्धल घुमजाव केले,त्यांना जाब विचारला जात नाही. इडीचे एजंट असल्याप्रमाणे वागणारे व कारवाई आधीच प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहिर वाच्यता करणारे किरिट सोमय्या यांना कोणी जाब विचारला जात नाही.याच सोमय्याने या आधी ज्यांच्या ज्याच्या विरोधात इडीच्या कारवाई चे सुतोवाच केले,ते भाजपा वा शिंदे गटात जाताच शेपुट घातली,त्याबद्दल मिडियाने कधी सोमय्याला फैलावर घेतले नाही.
त्या त्या प्रकरणी सोमय्या मवाळ झाले,तलवार म्यान केली म्हणून या मिडियाने कधी अशी मोहिम उघडली नाही.
ज्याच्या ढुंगणावर पोलीसांचा दंडुका पडतो,तो कितीही वाकड्या चालीचा असला तरी तो सरळ चालू लागतो,इथे तर एक ज्येष्ठ खासदार व शिवसेनेचा प्रवक्ता जो दिवसरात्र प्रसिद्धीच्या झोतात असतो तो तब्बल 103 दिवस तुरूंगात एकांतवासात राहतो,त्याने जर संयमी भाषा वापरली तर तो मवाळ झाला ! अशी कोल्हेकुई करणा-या मिडियाला काय उपमा द्यावी ?
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470