अपात्र व्यक्तींनी किंवा अधिक उत्पन्न असणार्यांनी रेशनचा हक्क स्वतःहून सोडावा- उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी
(सागर गायकवाड)
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या अपात्र व्यक्तींनी किंवा अधिक उत्पन्न असणार्यांनी रेशनचा हक्क स्वतःहून सोडावा. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिला आहे.
चारचाकी वाहनांचे मालक, शासकीय आणि निमशासकीय नोकरीतल्या व्यक्ती रेशन मिळवण्यासाठी अपात्र असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांची यादी तयार करण्याचं काम पुरवठा निरीक्षकांना देण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.