मेक इन इंडिया बैठक
देशात मेक इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कंटेनर्सची निर्मिती करून त्याद्वारे विविध प्रकारच्या वाहतुकीसाठी एक समन्वयक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे . यासंदर्भात काल नवी दिल्लीत एक उच्च स्तरीय बैठक झाली.
यामध्ये केंद्रीय बंदरे आणि जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, आणि खतमंत्री मनसुख मांडवीय यांनी यामध्ये सहभाग घेतला. आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत कंटेनर्सची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्यास आणि कंटेनर्सद्वारे अन्नधान्य, सिमेंट आणि खतांची जल वाहतूक केल्यास मोठ्या प्रमाणात खर्च कमी होऊ शकेल अस मत यावेळी झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आलं.