जनकल्याण पतसंस्थेची २५ वी रौप्य महोत्सवी यशस्वी वाटचाल
शिरपूर – जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची २५ वी रौप्य महोत्सवी वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि . ०६ ऑगष्ट रोजी दुपारी ४.०० वाजता वैद्य मार्केट येथील सभागृहात संपन्न झाली . सभेत अजेंडा प्रमाणे विषयावर विचार विनिमय करून सभासद बांधवांनी एकमताने सहमती दर्शविली . संस्थेचे चेअरमन , संचालक सर्व कर्मचारी व सभासद बांधवांनी केलेले सहकार्य यामुळे आज २५ वर्ष यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे असे संस्थापक दिलीप लोहार यांनी आपले मत व्यक्त केले . तसेच लवकरच रौप्य महोत्सव कार्यक्रम घेण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले . यावेळी सभासदांच्या पाल्यांचा इ . १० वी , १२ वी , पदवीधर , पदवीत्तर , परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविले आहे . त्यांचा गुणगौरव करण्यात आला . तसेच पतसंस्थेचे सभासद चंद्रशेखर जैन यांची मुलगी कु . मुस्कान जैन यांनी अतिशय विपरीत परिस्थितीत जिद्दीने सी.ए. च्या परिक्षत विशेष यश संपादन केले तसेच दिवंगत संचालक पुंडलिक आप्पा माळी उर्फ न्हानभाउ यांची कन्या कु . दिव्या ने बी.सी.ए. च्या परिक्षेत युनिर्व्हसिटीत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला म्हणून तीचा ही सत्कार यावेळी करण्यात आला . एकुण २४ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला . पतसंस्थेचे मॅनेजर शशिकांत चौधरी यांनी सुत्रसंचलन केले . आज संस्थेकडे ९ कोटी ४१ लाख ठेवी असून ८ कोटी ९ ६ लाखांचे कर्ज वाटप केले आहे . संस्थेला या आर्थिक वर्षात ९ .२५ लाख ऐवढा नफा झालेला आहे . ८ टक्के लाभांश दिला जाईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले . संस्था स्थापनेपासून संजय माळी , शशिकांत बडगुजर हे दोघेही अल्पबचत प्रतिनिधी म्हणून आज पंचविस वर्षापासून काम करीत आहेत . तसेच त्यांचे सोबत इतरही पिग्मी एजंट व्यवस्थीतपणे काम करीत आहेत . या प्रसंगी संस्थेचे सर्व संचालक , सभासद उपस्थित आहेत . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मचारी निलेश उर्फ रिंकु बडगुजर , मुकेश माळी , शशिकांत जोशी व अल्पबचत प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले .