रत्नाई कृषी महाविदयालयाच्या कृषीदूतांकडून पिंपरी बु येथे ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे उद्घाटन .
पिंपरी बू. दिनांक: १३/०६/२०२२
प्रतिनिधी: समाधान रजपूत.
पिंपरी बु(ता. इंदापूर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविदयालयाचे समन्वयक तसेच प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. Lएम. एकतपुरे, प्रा. एस. आडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शनानुसार कृषीदूतानी संदिप बगड़, समीर राजेंद्र देशमुख, विशाल दुरणे, सत्यम जायभाय, अभिषेक अगम, संतोष भांगरे, अभिषेक माने,मोहम्मद जूनेद यांकडून मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कृषीदूतांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. माती परीक्षणाचे मुल्य, पीकांवरील रोगांची घ्यावयाची काळजी व उपाय, भरघोस उत्पन्न होण्यासाठीचे मार्गदर्शन, शेतमाल निर्यात व साठवणूक याचे फायदे व तोटे याबाबतही मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच ज्योती श्रिकांत बोड़के, उपसरपंच पांडुरंग बोड़के, ग्रामपंचायत सदस्य समस्त ग्रामस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.