चंद्रपूर-मूल महामार्गावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची राज्यसरकारची घोषणा
प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर इथं काल झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधल्या नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.