करमाळा/प्रतिनिधी :- गणिताने मानवी जीवन व्यापक केले आहे, खरेतर, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी वैदिक गणित आणि अबॅकस महत्त्वाचे आहे.
वैदिक गणित म्हणजे यशस्वी आयुष्याची
गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले ते करमाळा येथील लीड स्कूल मध्ये
मुथा वैदिक मॅथ्स अकॅडमी च्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लीड स्कूलचे प्राचार्य आतिश क्षीरसागर यांनीही आपल्या मनोगतातून मुलांचे मानसशास्त्र आणि त्यांच्या भावविश्वातील मनोरंजक गोष्टींबद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली.यावेळेस गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह,सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास पालक वर्ग बहुसंख्यने उपस्थित होता.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.ज्योती मुथा यांनी अबॅकस आणि वैदिक गणिताचे फायदे सांगून ही काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे आभार प्रा.लतिका धुमाळ यांनी मानले.