देशातल्या वीज संकटावर मात करण्यासाठी कोल इंडिया राज्यांना अतिरीक्त कोळसा पुरवणार
महाराष्ट्रासह ७ राज्यातल्या कोळसा परिस्थितीचा आढावा केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज घेतला. या राज्यांमधलं वीज संकट कमी करण्यासाठी नियंत्रणात कोल इंडियानं पावणे ६ मेट्रीक टन अतिरीक्त कोळसा पुरवण्याची तयारी दाखवली आहे.
याशिवाय कोळसा उचलण्याची कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. तसंच रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या माध्यमातून वीज प्रकल्पांना १२ मेट्रीक टन कोळसा घेऊन जाण्याची परवानगीही देण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली.