करमाळा (सागर गायकवाड) :- महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना आठ तास दिवसा लाईट द्यावी. अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये वीज महावितरण कंपनीने शेतकऱ्यांनाच कृषी पंपाची लाईट रात्री चालू ठेवल्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागलेला आहे. रात्री-अपरात्री कृषिपंपाची लाईट आल्यानंतर, शेतकऱ्यांना दाऱ्यावरती जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी विंचू, साप, जंगली प्राणी यांच्यापासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. ज्या घरामध्ये कर्ता पुरुष नसलेल्या महिलांना रात्री-अपरात्री शेतामध्ये जावे लागत असल्यामुळे, अशा महिला शेतकऱ्यांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक कारणासाठी दिवसा लाईट सोडली जाते. आणि शेतकऱ्याला रात्रीची लाईट सोडली जाते. हा महावितरण कंपनीकडून दुजाभाव होत आहे व शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा आठ तास वीज द्यावी. या मागणीची दखल ताबडतोब घेण्यात यावी. दखल न घेतल्यास बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी.जे. काका पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माऊली, जवळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसनराव खोचरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष आत्तारपाटील, सोलापूर जिल्हासचिव बोरा, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई बोरा, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महिला मोरेताई, सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष राजेंद्र डोके, सोलापूर जिल्हा संघटक तानाजी पाटील, रमेश भोसले, सोलापूर जिल्हा अध्यक्ष कामगार संघटना रामेश्वर लोंढे, माढा तालुकाध्यक्ष पंडित पाटील, करमाळा तालुकाध्यक्ष भीमराव येडे, सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. असा इशारा सुपनवर यांनी दिला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष देविदास तळेकर, अनिल तेली, आजिनाथ इरकर, निलेश पडवळे समाधान मारकड, हनुमंत राऊत, गणेश इवरे, शिवाजी बनकर, नंदू तांगडे, सुनील खारे, माऊली मेढे, लाला हुलगे, संपत गव्हाणे, भालचंद्र इवरे, प्रकाश काळे, बाळासाहेब माने, हनुमंत राऊत, तुकाराम शिरसागर, नवनाथ कोळेकर आधी जनउपस्थित होते.