विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शिरपूर वीर एकलव्य यांना अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-09 at 4.05.44 PM

विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शिरपूर वीर एकलव्य यांना अभिवादन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिरपुर शहरातील खंडेराव मंदिर चौक येथे दि. 9 ऑगस्ट रोजी वीर एकलव्य महाराज यांच्या स्मारकास माल्या-अर्पण करत अभिवादन करण्यात आले..
यावेळी धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, हिंगोणी सरपंच सोमा भिल, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, शिरपुर भाजपा मा. शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर मा. चिटणीस राधेश्याम भोई सह आदी उपस्थिती होते.
पाणी, जंगल आणि जमिनीचे शतकानुशतके रक्षण करणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

जल, जंगल आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या आदिवासी समाजाने आपली अनोखी संस्कृती नेहमी जपून ठेवली आहे. निसर्गाचा आदर करत जगण्याची त्यांची जीवनशैली आज संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे. आदिवासी बांधवांच्या लोककला, भाषा आणि परंपरेने आपल्या देशाचा वारसा अधिक समृद्ध केला आहे. त्यांचे हे प्रेम आणि निसर्गाशी असलेले नाते आपल्या सर्वांना निसर्गावर प्रेम करण्याची शिकवण देते.i

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!