खळेगाव येथील 7/8 एकर हारभरा जळुन खाक झाल्याची घटना घडली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले
गेवराई तालुक्यातील खळेगाव येथिल धर्मराज नारायण शिंदे व भारत नारायण शिंदे यांचे गावालगत असणाऱ्या शेतातील काढून ठेवलेल्या हरभऱ्याच्या ढीगार्याला आग लागल्यामुळे हरभरा जळून खाक झाला आहे कोणी लागली व कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून शेतकऱ्यांसह गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे सविस्तर वृत्तांत आशिकी खळेगाव येथील शेतकरी धर्मराज नारायण शिंदे व भारत नारायण शिंदे यांनी अतिवृष्टीने वाया गेलेल्या खरीप पिकामुळे रब्बी हंगामातील हरभरा हे घेतलं देखील मोठ्या जोमाने कष्टाने खतपाणी खुरपणी करून आणलं लाखो रुपयाचे खर्च करून पिक आणले परंतु पीक काढून मळणी ठळक करण्यासाठी सर्व एका जागेवर गोळा केली असता या हरभऱ्याच्या ढीगाऱ्याला अचानक आग लागली आता ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने धाव घेतली परंतु वणवा अधिक रुंद रुप धारण केल्याने अंग विझवता आली नाही यांत हात तोडासी आलेल्या घांस गेला आहे हे कोणी व का केलं आशी चर्चा ग्रामस्थां सह शेतकऱ्यांना कडुन होत आहे.
या घटनेमुळे परिसरासह हाळहळ केली असून शेतकऱ्यांच्या लाखोचे नुकसान झाले आहे .
ग्रामस्थांकडून या घटनेचा तात्काळ छडा लावण्याची मागणी केली जात आहे यासह आगीत जळून खाक झालेला मालाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत ही देण्यात यावी अशीही चर्चा ग्रामस्थांकडून होत आहे.