देशात आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी कोविड निर्बंध शिथील करण्याची गरज – केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला
देशात आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी कोविड निर्बंध शिथील करण्याची गरज, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी व्यक्त केली आहे.
यासाठी देशभरात सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रम आणि सण उत्सव साजरे करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिक निर्बंध हटवावेत, रात्रीची संचारबंदी रद्द करावी, असं भल्ला यांनी, राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पातळीवर कोविड स्थितीचा आढावा घ्यावा, तसंच कोविड प्रतिबंधक नियमांचं पुरेपूर पालन करावं, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.