शहरातील तांबेपुरा भागात मुलींस पळवून नेल्याच्या प्रकरणी दोन गटात हाणामारी
मार्मिक न्यूज नेटवर्क:
शहरातील तांबेपुरा भागात गेल्या काही दिवसांपूर्वी एक गंभीर घटना घडली आहे. स्थानिक माहितीगणिक, एक उच्चब्रु कुटुंबातील तरुणी घरातून निघून गेली होती, ज्यामुळे तिच्या कुटुंबाने शोध सुरू केला. परंतु, त्या तरुणीला पळवून नेणाऱ्या मुलाने तिला पंजाब नेल्याचे समजल्यावर तिच्या नातेवाइकांनी त्या मुलाच्या कुटुंबियास विचारणा केली असता “आमच्या मुलीचा शोध घेण्यासाठी सहकार्य करा.” परंतु, या चर्चेतून शब्दांची तीव्रता वाढत गेली आणि दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती यावेळी तांबेपुरा भागात वातावरण तणावग्रस्त झाले होते. रात्री उशिरा पर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर बऱ्याच जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.
या प्रकारामुळे स्थानिक समाजात चिंता व्यक्त केली जात आहे, आणि पोलिस प्रशासनाने अशा घटनांचे गंभीरपणे परीक्षण करणे आवश्यक आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशी घटना उघडकीस येऊ नये.
प्रकरणाकडे खासदार वाघ यांचे लक्ष लागून..
अमळनेर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेरोजगारी मुळे सट्टे- पत्ते – मटका जुगारां चे प्रकार वाढत चालले आहेत त्यातच गुन्हेगार वृत्ती मुळे अमळनेर शहर हिटलीस्टवर आहे. संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी शहरात शांतता कायम राहावी यासाठी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली असल्याचे समजते.
अमळनेर पोलिसांचां पंजाब तपास..
उच्चभ्रू कुटुंबातील मुलीचा शोधच्या मागवर असलेल्या अमळनेर पोलिसांना सतत 3 दिवस पाठलाग करूनं हाती काहीही आले नाही, शेवटी रिकाम्या हाती पोलीस परतले खरे, परंतु महाराष्ट्रातू पंजाब ला मुली पोच होतात अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे खूप मोठे रॅकेट असल्याचे प्रत्येक्षदर्शीनी कळवले. असून यासंदर्भात तपास सुरू आहे. असेही ते म्हटले.