अन्यथा-
साहेब, आमची हकालपट्टी करा !
तो शिवसेना विरोधक होता,शाखेत जातो म्हणुन लहान भाऊ अंकुशला मारायचा,
एकदा तर त्याने शिनसेना शाखेच्या सूचना फलकावर लाथ मारली होती,नंतर शिवसेनेची लाट पाहून शिवसेनेत आला व दोन वेळा नगरसेवक झाला; नंतर गणेश नाईक फुटल्यावर तो राष्ट्रवादीत गेला, मनपाच्या निवडणूका शिवसेने विरोधात लढला आणि पराभूत झाला, गेल्या २० वर्षात विधानसभा असो की लोकसभा त्याने शिवसेना विरोधातच काम केले. राष्ट्रवादीत गैरव्यवहार केले म्हणून भारत गंगोत्रीने त्याची हकालपट्टी केली तेव्हा हा संधी साधू पुन्हा शिवसेनेत आला.ना कार्यक्षमता ना शारिरीक कुवत ना आर्थिक पाठबल असा हा कुचकामी माणूस !
सार्वजनिक मित्र मंडळात गैरव्यवहार करणारा, बोगस पावती पुस्तक छापुन देणगी गोळा केल्याचा आरोप असलेला,सार्वजनिक मित्र मंडळात बनवाबनवी व खोटे दस्तऐवज तयार करून सहाय्यक धर्मदाय आयुक्तांची फसवणूक केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने दहा हजार रूपयांचा दंड थोटावताच केस टाळण्यासाठी गुपगुमान १० हजाराचा दंड भरणारा-
*असा महान कार्यकर्ता अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून कल्याण जिल्हा प्रमुखाच्या आदेशाने नेमला जातो,अंबरनाथ शहरात कुत्रंही ओळखत नसलेला हा आमचा नेता म्हणून कसा स्विकारायचा ?*
निव्वळ कल्याण जिल्हा प्रमुखाचा कृपाशिर्वीद म्हणून असे लोक आमच्यावर नेते म्हणून लादले जात असतील तर कोणाला दोष द्यायचा ? शिवसेनेचे खच्चिकरण करायला विरोधकांची गरजच काय ?
*उल्हासनगर पश्चिमचा शहर प्रमुख जो केमिकल टॅन्कर व्यवसायिक आहे, शिवसेनेत सक्रिय नव्हता त्याला शहर प्रमुख पद बहाल केले. त्याने निवडणूकीत ३५ हजाराचा निधी दिला व अडिच लाखांचे बॅनर वाढदिवसाला लावले त्याची परतफेड म्हणून ज्येष्ठ पदाधिकारी शिवाजी जावळे, पक्ष निष्ठेसाठी दीड वर्षे तडिपारी भोगली परंतू मिंधे पुढे झुकला नाही असा सुरेश पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप मिश्रा यांना डावलून झुकते माप देऊन ज्याला शहर प्रमुख पद बहाल केले, त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही स्विकारून काम करायचे का ?*
ज्याने आपली हयात कॉन्ग्रेस मध्ये घालवली,ज्याच्या पत्नीने दोन वेळा कॉन्ग्रेसचे महापौर पद भुषविले,ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे त्याने “महानगर प्रमुख” म्हणून निष्ठावंत शिवसेना पदाधिका-यांवर हुकमत गाजवावी व त्याच्या आदेश व मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करावे ?
त्यापेक्षा मा.उद्धव साहेबांनी आमचीच पक्षातून हकालपट्टी करावी.आमची नाळ शिवसेनेशी ५२ वर्षा पुर्वी जुळलेली आहे त्यामुळे आम्ही ती नाळ तोडू शकत नाही.आमचे आयुष्य मा.बाळासाहेब ठाकरे ,वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी,प्रिं. मनोहर जोशी, भ्रमंतीकार भटक्या प्रमोद नवलकर, धर्मवीर आनंद दिघे,साबीरभाई शेख, मो.दा.जोशी,सतिश प्रधान यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांच्या सहवासात ५२ वर्षे गेले.आयुष्याच्या उतरंडीवर आम्ही यांचे नेतृत्व स्विकारण्या ऐवजी पक्षाला जय महाराष्ट्र करून निवृत्ती घ्यावी असे पक्षास वाटत असेल तर कृपया आमची पक्षातून हकालपट्टी करावी.कारण आम्ही स्वतःहून पक्ष सोडू शकत नाही. किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघाची संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने योग्य पदाधिकारी नेमुन सन्मानाने कार्यरत ठेवावे !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक
९८२२९०२४७०