कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता भाजपा युतीच्या उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे…
बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) आपल्या तालुक्याचा विकास माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल,खासदार हिनाताई गावित, आमदार काशीराम पावरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या माध्यमातून आपण करत आहोत. राज्यात भाजपा युतीचे सरकार आहे. केंद्रात देखील भाजपाचे सरकार येणार आहे. त्यात कोणतीही शंका नाही. गेल्या साठ वर्षांच्या काळात आपल्या आदिवासी भागाचा विकास थांबला होता. तेच विकास कामे केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून केंद्राच्या विविध योजनाचा लाभ तळागाळातील लोकांना मिळत आहे. आपल्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी तालुक्याचे नेते मंडळी भक्कम आहेत. म्हणून कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता भाजपा युतीच्या उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी आदिवासी भागातील धाबापाडा येथे कार्यकर्ते व मतदारांशी बोलत होते.
धाबापाडा येथील कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य तिरंग पावरा , दिनेश पावरा , गाव पाटील जगण पावरा,तुळशीराम पावरा, विकास सोसायटीचे चेअरमन राज निकम, माजी व्हा.चेअरमन भागवत पवार, दारासिंग पावरा , मंसाराम पावरा, दला पावरा, वसंत आप्पा , हेमंत पाटील , शरद पवार , सागर सैंदाने, समाधान पाटील , जितू पावरा , उक्या पावरा ,नाना वना पावरा, महिला बघिणी मेंगुबाई पावरा ,बाटी पावरा,नर्मदाबाई पावरा, सुमन पावरा,यांच्या सह परिसरातील व गावातील महिला- पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल रंधे पुढे म्हणाले की, आपल्या तालुक्यात व आदिवासी भागात कोणाच्या माध्यमातून विकास कामे होत आहे. हे तर सर्वांनाच माहित आहे. हे सांगायची गरज आपल्याला नाही. निवडणूक आली की लोकांना भूलथापांना देण्याचे काम विरोधी पक्षातील लोक करीत असतात,व काही युवकांना हाताशी धरून अप्रचार करतात. पण त्याचा काही एक फरक पडणार नाही. कारण आपल्या तालुक्याचा जो विकास झाला आहे. तो दुसऱ्याकडे कुठेही झालेला दिसून येत नाही. म्हणून आपला तालुका विकासाच्या बाबतीत अग्रेसर असून त्याला यापुढेही अग्रेसर ठेवायचे आहे. आपल्या भागातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, मोठ्या पदांवर अधिकारी झाले तर बरेच युवक चांगल्या पदांवर काम करीत आहे. व येणाऱ्या भविष्यकाळात देखील युवकांना नोकऱ्यांची संधी व रोजगाराची संधी भाजपा सरकार उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला डॉ. हिनाताई गावित यांना विक्रमी मतांनी निवडून आणायचे आव्हान पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे उपस्थित मतदारांना केले.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील सर्वच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कारण यंदाच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना दीड लाखाच्या मताधिक शिरपूर तालुक्यातून मिळून द्यायचे आहे. म्हणून सर्व कामाला लागले आहेत. तालुक्याचे विकासरत्न माजी शालेय शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे, शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,तालुका अध्यक्ष किशोर माळी, विधानसभा प्रमुख के डी पाटील, शहर प्रमुख हेमंत पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या परीने मतदारांशी संपर्क साधत आहे.
यावेळी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी सातपुड्यातील आदिवासी गावांमध्ये जाऊन प्रचाराची धुरा सांभाळली आहे. कारण आदिवासी भागातील गाव-पाडयातील प्रत्येक घरातील नागरिकांशी राहुल रंधे यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने रात्री बे रात्री ह्या गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम राहुल रंधे करीत आहेत. तसेच त्यांनी स्वखर्चाने गाव पाड्यांवर बोरवेल करून गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्याचबरोबर विजेच्या समस्या रस्ते रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी पाठवण्याची व्यवस्था व केंद्र शासन व राज्य शासन यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून लोकांना लाभ मिळवून दिला आहे तसेच शिरपूर तालुक्याचा विकासासाठी अमरीशभाई पटेल, खासदार हिनाताई गावित, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आमदार काशीराम पावरा, हे चारसह बड्या नेत्यांच्या निधीतून शिरपूर तालुक्यात विकासाची गंगा अवतरल्याशिवाय राहणार नाही.
यासभेचे सुत्रसंचलन सचिन पाटील तर आभार प्रमोद पाटील यांनी केले.