श्री. अंबऋषी महाराज टेकडीवर पिंपळाच्या रोपांची काही विध्वंस प्रवृत्तीकडून रोपे तोडल्याने त्या रोपांना प्लास्टर करून जगविण्याचा प्रयत्न
अमळनेर : विक्की जाधव..
श्री अंबऋषी महाराज टेकडी ग्रुप सतात करत असुन अजून असाच प्रकार मागील काही दिवसापासून घडत आहे,
जसे अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार
करतात त्याच प्रमाणे या तुटलेल्या झाडांना (रोपांना) पुन्हा जगावण्या साठी बँडेज करून त्यांच्या जखमा भरण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात
टेकडी ग्रुपने अहोरात्र परिश्रम घेऊन टेकडीवर वृक्षांचे संवर्धन केले असून त्यांची निगा संपूर्ण टेकडी ग्रुपचे सदस्य घेत असतात. मात्र काही विध्वंस प्रवृत्तीच्या लोकांनी अनेकदा याठिकाणी आगी लावून रोपे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असुन ग्रुप सदस्यांनी प्रचंड दुःख व्यक्त केले आहे .
यां ठिकाणी तळीराम आणि मजनु चा देखील असतो वावर..
गाव आणि रहदारीने दूर असल्यामुळे या ठिकाणी मद्द प्रेमी तळीराम यांचा या भागात वावर असतो यातील चं काही विध्वंस प्रवृत्तीचे लोक असे करत असल्याचा अंदाज आहे.