बीएपीएस स्वामीनारायण मंदिर अमळनेर येथे दिव्य सत्संग सभेचे आयोजन
अमळनेर येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात आज दिनांक 19 मार्च 2024 वार मंगळवार रोजी बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळाच्या वतीने दिव्य सत्संग सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दिव्य सत्संग सभेला बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे खानदेशचे कोठारी संत पूज्य आनंद जीवन स्वामी व पूज्य पुरुषोत्तमदास स्वामी यांच्या सत्संग प्रवचनांचा लाभ मिळाला तर याप्रसंगी आनंद जीवन स्वामींनी अनमोल उपहार की प्राप्ती या विषयावर सर्व गुणवावी वारी भक्तांना प्रवचनाचा लाभ दिला याप्रसंगी आपले विचार मांडत असताना पण जाणन जीवन स्वामींनी भगवंताने आपल्याला अतिशय अनमोल असे शरीर दिलेले आहे हे शरीर अनेक कल्पनांची साधना केल्यानंतर प्राप्त होते त्या शरीराचा उपयोग आपण उत्तम उत्तम कार्य व भगवंताची साधुसंतांची सेवा भक्ती करण्यासाठी व्यथित करावा. आपल्याला या सत्संगामध्ये परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज व प्रकट गुरुवारी महंत स्वामी महाराज यांच्यासारखे अक्षर ब्रह्म गुरु लाभलेल्या आहेत त्यांच्या आज्ञेचे पालन करून आपण आपले जीवन उज्वल बनविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे स्वयं भगवान स्वामीनारायण यांनी नीलकंठवणी अवतारामध्ये या शरीराच्या माध्यमातूनच स्वतः परब्रम्ह असताना देखील साधना केली होती. बीएपीएस स्वामीनारायण संस्था ही जगाभरातली नामांकित अशी अध्यात्मिक संस्था आहे या संस्थेने आतापर्यंत अनेक उत्तम अशा मंदिरांची व गांधीनगर दिल्ली रॉबिन्स विल अमेरिका या ठिकाणी अक्षरधाम स्मारकांची निर्मिती केली आहे तसेच देशावर व समाजावर आलेल्या प्रत्येक संकटात संस्थाही मदतीसाठी उभी राहिली आहे अशा दिव्य बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे मंदिर अमळनेर येथे आहे सर्व हरिभक्तांनी गुणभावींनी या मंदिराचा दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन उपकृत केले पाहिजे . तसेच बीएपीएस स्वामीनारायण मंदिर धुळे येथे गुरुहरी परमपूज्य महंत स्वामी महाराजांच्या आज्ञानुसार पौर्णिमा उत्सव सुरू केला आहे तरी सर्व भाविकांनी या पौर्णिमा उत्सवाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली स्वामींनी मांडलेल्या विचारांमुळे सर्व हरिभक्त व गुणभावी प्रभावीत झालेले होते. याप्रसंगी हरिभक्तांची व गुणभावींची उपस्थित संख्या देखील वाखाणण्याजोगी होती.
सदर दिव्य सत्संग सभा यशस्वी करण्यासाठी बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळ अमळनेर च्या सर्व हरिभक्त कार्यकर युवक युवती बालमंडळ बालका मंडळ या सर्वांनी परिश्रम केले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ही दिव्य सभा यशस्वी होण्यासाठी सेवाभाव राखत सर्वांनीच आपली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केली.