July 1, 2025 10:18 am

भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना नुकसान भरपाईचे निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना नुकसान भरपाईचे निवेदन

रजत डेकाटे -प्रतिनिधी नागपूर

भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे गारपिटीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले.११ फेब्रुवारी ला झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्याने सुटेना असा प्रश्न उपस्थित झाला आहे..?
शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावून
तात्काळ पंचनामे करून सर्वोतोपरी मदत करण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी शेतात असलेले गहू, हरभरा, मुंग या पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे म्हणून शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना नुकसान भरपाईचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शेतकरी मनोहर वानखेडे, विलास मेश्राम, राहुल गोवारदिपे, दामोधर इंगोले, पंजाबराव इंगोले, संजय नेवारे, रामचंद्र सहारे, संजय ढोरे, दिलीप गोवारदिपे, पंकज चेपटकर, प्रमोद गजघाटे,आनंदराव आंभोरे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!