आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमुळेच : राजवर्धन हर्षवर्धन पाटील
(निलेश गायकवाड )
इंदापूर तालुक्यातील छोट्याश्या बावडा गांवांत आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचा जन्म झाला. आदरणीय साहेबांवरील वडीलांचे छत्र लहाणपनीच हरपले कुटंबातील मोठा म्हणुन सर्व कुटंबाची जबाबदारी आदरणीय साहेबांच्या खांदयावर पडली कष्ट करण्याची उमेद, जीद्द, चिकित्सक वृत्ती, चाणाक्ष नीती या गुणांमुळे न डगमगता ती जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. त्यावेळच्या परिस्तीथीशी लढण्यासाठी जी उमेद दीली ती गावातील सर्वसामान्य जनतेने. साहेबांमधील गुण पाहुण जणता जनार्दन यांनी साहेबांना राजकारणात सक्रिय होण्याची विनंती केली. जनतेच्या आग्रहाखातर साहेबांची राजकीय सुरवात शिवामृत डेअरी चे संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, जिल्हा परिशद सदस्य, जिल्हा दुध संघ संचालक अशी झाली .
आपल्या कुशल नेतृत्वाने आणि चाणाक्ष नीतीने साहेबांनी जनतेच्या मनावर मनावर अधीराज्य केले. म्हणुननच 1995 साली कोणतीही राजकीय परिस्थिती आपल्या बाजुने नसताना सर्वसामान्य जनतेने तालुक्यात उठाव केला आणि आदरणीय साहेबांना बंडखोरी करण्यास भाग पाडले. साहेबांनी बंडखोरी केली आणि साहेब पहिल्यांदा जनता जनार्दनाच्या प्रयत्नामुळे विधानसभेवर निवडून आले. साहेब कृषीराज्य झाले त्यानंतर साहेबांनी मागे वळून पाहिले नाही हे सर्व शक्य झाले ते जणतेचा साहेबांवर असलेला विष्वास आणि जणतेने दिलेले प्रेम यामुळे.
सर्व सामान्य जनतेच्या कृपाशीर्वादाने साहेबांनी महाराष्ट्र राज्य शासनाची पणन, महिला व बालविकास, सांस्कृतीक, सहकार, संसदीय कार्य आदि महत्वाची खाती सांभाळत नावलौकीक केला. या काळात जणता आणि साहेब हेच समीकरण होते. जणतेनी साहेबांना सांगावे आणि जणतेचा कौल समजुन साहेबांनी विकास कामे करावीत. साहेबांनी सांगावे आणि जनतेनी साहेबांचा शब्द खाली पडु देऊ नये इतके औदार्याचे संबध साहेब आणि जनता यांच्यामध्ये राहिले. जनतेच्या या ऋणातून थोडी तरी उतराई व्हावी म्हणून दूरदृष्टी ठेऊन जनतेच्या कल्याणासाठी साहेबानी तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे उभा केले. त्यावेळी उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणुन राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरव होताना आपण सर्वांनी पाहिलं यापेक्षा आम्हा कुटुंबियांचे भाग्य ते काय? जे काही सोन्याचे दिवस पाहिले ते फक्त आणि फक्त इंदापूर तालुक्यातील जणता जनार्दनांमुळे. आज आदरणीय साहेब, अंकिताताई व मी राजकीय क्षेत्रात ज्या ठिकाणी आहोत ते हि आपले मायबाप जनतेचे प्रेमाच आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता जनार्दन याना विसरणे कदापी शक्य नाही, असे पत्रकारांशी संवाद साधताना राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी भावनिक मत व्यक्त केले.